* गरीबापर्यंत धान्य
पोहोचू न देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश
उस्मानाबाद, दि.22(जिमाका):- जिल्ह्यात रेशन वाटपाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. गोर गरिबांना
रेशनवरील मंजूर गहू , तांदूळ मिळालेे पाहिजे. या गोरगरिबांना रेशनवरील धान्य योग्य
पद्धतीने मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही नियम शिथिल केले
आहे. तरीही काही विशिष्ट लोक गरिबांना
अडचणी आणत असतील व त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनवरील धान्य मिळू देत नसतील तर
त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत.
खरीप आढावा बैठकीस
जिल्ह्यातील आमदार , खासदार तसेच कृषि खात्याचे अधिकारी उपस्थित होते . त्यानंतर
पालकमंत्री यांनी रेशन वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला . जिल्ह्यातील किती लोकांना
वाटप झाले आहे , वाटप कसे चालू आहे , याबाबत सर्व माहिती घेतली व अधिकाऱ्यांना
आदेश देतांना सांगितले की माझ्याकडे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे रेशन वितरणबाबत
विविध तक्रारी आल्या आहेत . गोर गरिबांना वितरण होणे ही आपली सर्वांची जबाबदारी
आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करून गोर गरीब जनतेला वेळेत व
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धान्य पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी
दिले .
मा.पालकमंत्री महोदय यांनी दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी
च्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ चारुशीला देशमुख यांनी
उस्मानाबाद शहरामधील खाजानगर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 9 ची आकस्मित
तपासणी केली. या तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आलेले आहेत, तरी त्यानुसार हया
दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment