Followers

Wednesday 30 September 2020

मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


कोरोनामुळे होणा-या मृत्युदराचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्याचा निर्धार- डॉ. तात्याराव लहाने


मुंबई दि. 30 : शासकीय रूग्णालयातील डॉक्टरअधीक्षकप्राध्यापकप्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयद कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालयगोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणालेमाता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतुजेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचा-यांना कोरोनाने ग्रासले होतेमात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरिब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असूनपुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या  वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करूनत्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

            वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणालेडॉक्टरअधीक्षकप्राध्यापकप्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन), स्वच्छता निरीक्षक आदींसोबत वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी उत्तम काम केले आहे. सुरुवातीला कोविड-१९ संदर्भात अधिक माहिती नसल्याने अनेक अडचणींना आणि रूग्णांच्या मृत्युला सामोरे जावे लागत होते. मात्रया परिस्थितीतही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. सुरुवातीला तीनच लॅब होत्या मात्र आज १५४ लॅब१४९० व्हेंटीलेटर१६५० आयसीयु बेडतीन लाख सात हजार बेड१८ मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत. सुरुवातीला मृत्युदर ५० टक्के होता. आज २.६ टक्के आहे आणि हाच मृत्युदर शुन्य टक्क्यावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गतही काम सुरू असूनशुन्य टक्के मृत्युदरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लवकरच पुर्ण करू, असेही डॉक्टर लहाने यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वरराज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


Monday 28 September 2020

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू - कृषि मंत्री दादाजी भुसे

 


नांदेड (जिमाका) दि. 27:-  मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधतो आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील कासारखेडा या गावातील शिवारांची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

 

पूरभाजी तुकाराम शिंदे या शेतकऱ्याने कृषि मंत्र्यांचे लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबिन हातचे गेले आहे. शिंदे व इतर शेतकऱ्यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषि विभागाला दिले.

 

परभणी,‍ हिंगोली आणि आता नांदेड येथील अतिवृष्टीच्या भागात मी पाहणी करत असून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.


अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे -कृषिमंत्री दादाजी भुसे

 



*अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत*
*राज्यातील पीक नुकसानीच्या सर्व पंचनाम्याचे संकलन करून केंद्र शासनाला अहवाल सादर करणार*
*पी. एम. किसान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्त मोहीम राबवावी*
*महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 30 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 19 हजार 500 कोटीचा लाभ*
*कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पुनर्वित्त पुरवठा झाला पाहिजे*
*विकेल ते पिकेल व स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार व ग्राहकांना शेतकऱ्यांचा माल थेट पोहोचविणार*
*पिक विमा बाबत शेतकऱ्यांच्या ऑफलाइन तक्रारी प्रशासनाने स्वीकारण्याचे निर्देश*
*अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत मराठवाडा व विदर्भाला अधिक प्राधान्य देणार*
*सर्व बँकाकडून शेतकर्यांना सन्मानजनक वागणूक मिळालीच पाहिजे*
लातूर/उस्मानाबाद, दि.27(जिमाका):- राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकामध्ये पाणी साचले जाऊन सोयाबीन, तूर ,कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच काही पिकांना जागेवरच कोंबे आलेली आहेत. तरी प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे पंचनामे त्वरित करून प्रस्ताव सादर करावेत. राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर व उस्मानाबाद या दोन्हीही जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा व कृषिविषयक योजनांच्या आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय चौगुले, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, ऊस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घ्याव्यात. या सर्व माहितीचे संकलन करून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने पाहणी करावी याबाबत केंद्राकडे मागणी केली जाणार आहे. राज्य शासन ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
पी एम किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. महसूल व कृषी विभागाने यासाठी एक संयुक्त मोहीम राबवावी व या मोहिमेच्या माध्यमातून या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी देऊन लातूर जिल्ह्यातील तीन लाख 17 हजार शेतकऱ्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही देशातील एकमेव अशी योजना आहे की अत्यंत कमी कालावधीत व कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही राज्यातील जवळपास 30 लाख 50 हजार शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून 19 हजार 500 कोटी चा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना बँकाकडून पुनर्वित्त पुरवठा झालेला आहे का नाही याबाबतची माहिती प्रशासनाने घ्यावी व त्या प्रत्येक शेतकऱ्याला पुनर्वित्त पुरवठा मिळवून द्यावा असेही त्यांनी सूचित केले.
खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे याबाबत कृषि विभागाने प्रबोधन करावे. माननीय मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे, त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे व ग्राहकांनाही शेतकऱ्यांचा थेट माल पोहोच केला जाणार असल्याची माहिती श्री. भुसे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत मराठवाडा व विदर्भाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना सक्षम केले जाणार आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार आहे, त्यामुळे प्रशासन व कृषी विभाग यांनी खते व बियाण्याच्या तयारीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश श्री भुसे यांनी दिले.
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे, वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन करण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगून बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. तसेच बँकाकडून पीक कर्जाच्या वेळेस शेतकर्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे, त्याबाबत बँकांनी योग्य ती दक्षता घेऊन सर्व शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक द्यावी अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. व यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी निर्देशीत केले.
लातूर जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित सुरू करण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार घाडगे पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार, आमदार विजय चौगुले यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे, पीक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शेततळे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणे आदी मागण्या करून त्याबाबत सकारात्मक विचार करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी असे आवाहन केले.
प्रारंभी लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गवसाने यांनी लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेला असून 60 पैकी 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे व एकूण 99 हजार 551 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. उस्मानाबाद चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या 103 टक्के पाऊस झालेला असून 21 मंडळात शंभर टक्के पाऊस झालेला असून सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर 41 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.
*वांजरवाडा ता. जळकोट येथील पीक नुकसानीची पाहणी*
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेती पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. या भागातील सोयाबीनच्या पिकात पावसाचे पाणी साचल्याने पिके पिवळी पडली असून सोयाबीनच्या शेंगांना कोंबे आल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याबरोबरच कृषि सह संचालक श्री. जगताप व उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. तीर्थकर उपस्थित होते.

नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक




▪️“माझे कुटूंब माझी जबाबदारी” आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनातर्फे सादरीकरण
नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी शासन पातळीवरुन जिल्हा प्रशासनाने “माझे कुटूंब माझी जबाबदारी” मोहिम कल्पक व प्रभावीपणे राबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेंतर्गत लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. एखाद्या कुटूंबात कुणाला आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा सल्ला दिला तर त्याला ही प्रक्रिया सहज आणि सुलभ लक्षात यावी व याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधोपचार देता यावीत यासाठी एक कल्पक कीट तयार करण्यात आले. या कीटचेही त्यांनी कौतुक करुन इतर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नबाब मलिक, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विशेष पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आदी अधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा प्रशासनाची सर्व टिम परस्परांशी योग्य समन्वय राखत कोविड-19 च्या या काळात अतिशय चांगले काम करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्यादृष्टीने ऑक्सीजन वाहतुकीसाठी टँकरची उपलब्धी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेवा-सुविधा विस्तारासाठी करावे लागणारे नियोजन याकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहमती दर्शविली. याबाबत तातडीने हा प्रश्न मार्गी लावू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा असून त्याप्रमाणात आव्हाने जास्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या आव्हानावर यशस्वी मात करता येणे जिल्हा प्रशासनाला सुकर झाले असून “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेच्या जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेंतर्गत गृहविलगीकरणासाठी आरोग्याच्यादृष्टिने एक परिपूर्ण अशी कीट तयार करण्यात आली असून ज्या व्यक्तींना वैद्यकीय टिमने विलगीकरणासाठी सूचविले आहे अशा व्यक्तींना ही किट दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. या कीटमध्ये मास्क, गृहविलगीकरण मार्गदर्शीका, अत्यावश्यक औषधे, डेटॉल साबण आदी साहित्य ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात या मोहिमेत अधिकाधिक सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्याचे नियोजन केले असून लोककला, पारंपारिक कला यांचा आरोग्य साक्षरतेसाठी प्रभावी उपयोग करु असे ते म्हणाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, डॉ. शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी

 



*अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विहिरी, नदी काठावरील बंधाऱ्याचे पंचनामे करण्याचे निर्देश*
लातूर/उदगीर ,दि.26(जिमाका): उदगीर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसाने मुग , तुर सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
उदगीर तालुक्यातील नागलगाव, सुमठाण, धडकनाळ येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहाणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. यावेळी उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी श्री नाबदे, बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजी मुळे , कल्याण पाटील, चंदन पाटील नागराळकर व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त एक ही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहता कामा नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच नुकसान झालेल्या पीकाचे विमा मिळण्यासाठीचे अर्ज शेतकऱ्यांनी तात्काळ भरावे यासाठी कृषी विभागाने आँनलाईन /आँफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीने या नुकसानीचे पंचनामे बाबत अत्यंत तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे , नदी काठावर शेतकऱ्यांचे बंधारे वाहून गेले आहेत तसेच बंधाऱ्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशाचे सुद्धा पंचनामे करण्यात यावेत. या शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागामार्फत मदत करण्यात येईल, आश्वासन राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी उदगीर उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे ची कारवाई सुरू असून येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीतपणे घेण्यात येणार -उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 



उस्मानाबाद,दि.24 (जिमाका) बीए, बीकॉम, बीएस्सी, एमए, एमकॉम, एमस्सी यासह सर्व विभागातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे ऑक्टोंबर 2020 अखेर पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरळीतपणे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास,ऊर्जा,आदिवासी विकास,उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षा कोविड-19 मुक्त वातावरणात कशी घेता येईल ? याबाबत आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर,गोविंद काळे, संचालक डॉ.दत्तात्रय गायकवाड, उप कुलसचिव विष्णू कऱ्हाळे, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख आदिसह विद्यापीठाचे पदाधिकारी प्राध्यपक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्याच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा कोरोना-19 मुक्त वातावरणात कशा घेता येतील ? यासाठी संपूर्ण विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत असून एकही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेला नव्हता त्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दि.29 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली असून विशेष म्हणजे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा दयाची हे पर्याय त्यांना खुले केले असून आतापर्यंत 70 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेला प्राधान्य दिले आहे. या परीक्षा एमकेसीएल ने तयार केलेल्या सॉप्टवेअरवर घेण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय असेल त्या ठिकाणी देखील परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात घेण्यात येणार असून एका विद्यार्थ्यांला चार तासापैकी एक तास परीक्षेसाठी देण्यात येणार आहे, असे त्यांनी सुचित केले.
या परीक्षा सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार व युजीसीच्या नियमवलीनुसार घेण्यात येणार आहे.ज्या रुममध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी बसला आहे.त्या विद्यार्थ्याजवळ दुसरा व्यक्ती जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यामध्ये परीक्षेबाबत जनजागृती चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हयातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्याची स्वतंत्र बैठक घेण्यात आलेली आहे.तसेच त्याबरोबरच जे विद्यार्थी अनुर्तीण त्याना निकाला नंतर एक महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना विशेषता दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षकांनी मोबाईल परीक्षेच्या काळात उपलब्ध करून दयायचे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 80 हजार 283 विद्यार्थी परीक्षा देणार असून 1 हजार 46 दिव्यांग विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून या सर्व विद्यार्थ्यांची सर्व सुविधा प्रक्रिया पुरविण्याचे काम विद्यापीठ स्तरावर अतिशय नियोजन बध्द पध्दतीने सुरू असल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.
यावेळी उपकेंद्रात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी मंत्री महोदयाकडे मागणी केली तर यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोग लागु करावा यासह इतर मागण्याचे निवेदन दिले.
*जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट*
उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी प्रत्यक्ष भेट देऊन केली. तसेच या ठिकाणी कशा पद्धतीने कोविड रुग्णावर उपचार केले जात आहेत याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी सचिन बोडके, डॉ.सचिन देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा -राज्यमंत्री संजय बनसोडे

 


लातूर, दि23( जिमाका):- जिल्हृयामध्ये यावर्षी आजअखेर सरासरीच्या 105% पाऊस पडलेला असून काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सुध्दा झालेली आहे. तसेच मागील 10 दिवसापासुन सतत पाऊस होत असून यामूळेही काही ठिकाणी पुर/क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान होत आहे. यानुषंगाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वर नमूद कारणाने नुकसान झालेले आहे असा कोणताही शेतकरी पंचनाम्यामधून सूटणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत प्रशासनास सूचना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत अर्ज करावा, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

जिल्हृयामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तीक शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने पिक नुकसान पूर्वसुचना देण्याकरीता सूविधा उपलब्ध आहे. पिक विमा योजनेमध्ये शेतात पाणी थांबून राहील्यामूळे झालेले नुकसान व पूराचे पाणी शेतात घूसल्याने झालेले नुकसान या दोन बाबींमूळे झालेले नुकसानी संदर्भात नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांचे वरील कारणाने नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. ऑफलाईन अर्जासाठी प्रत्येक तालूक्याच्या तालूका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये विमा कंपनीचा प्रतिनिधी उपलब्ध आहे. या संबंधाने शेतकरी या प्रतिनिधीकडे अर्ज करु शकतात अर्जासोबत पिक विमा भरल्याची पावती व 7/12 उतारा कागदपत्र सादर करावीत.
शेतकरी ऑफलाईन अर्ज बँक/महसूल विभाग/कृषि विभाग यांच्याकडेही करु शकतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Crop Insurance मोबाइल ॲपचा वापर करुन नुकसानीची सूचना देता येईल.
तरी ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी जिल्हृयातील शेतकऱ्यांना केले आहे.