Followers

Saturday 21 October 2023

श्री तुळजाभवानी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव -2023

  


धाराशिव, दि.21 (जिमाका) शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

            श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री.तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे,ही अवतार पूजा मांडण्यात येते. दरम्यान,काल रात्री श्री. देवीजींची छबिना मिरवणूक सिंह वाहनावरुन काढण्यात आली.  

उद्या 22 ऑक्टोबर रोजी श्री. तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.                                


Friday 20 October 2023

श्री. तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव -2023




धाराशिव दि.20 (जिमाका) शारदीय नवरात्र महोत्सवात आज 20 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्री.तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  

         श्री.तुळजाभवानीच्या आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला.यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले. त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीस जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री. तुळजाभवानी  मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले.त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते.अशी आख्यायिका सांगितली जाते.

              शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री.तुळजाभवानी देवीचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.यात,उद्या 21 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 22 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.    

दरम्यान,काल गुरुवारी रात्री श्री. देवीची मयुर वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. 

 

Thursday 19 October 2023

Skill Development training will usher in a new dawn in the life of India’s youth - PM Narendra Modi

Skill Development training will usher in a new dawn in the life of India’s youth
- PM Narendra Modi
Prime Minister inaugurates Pramod Mahajan Rural Skill Development Center
Praises the concept of Maharashtra, association of opportunity and training important
Skill Development Centers will prove to be employment temples- CM Eknath Shinde

Mumbai, Oct 19 : Skill Development Training will usher in a new dawn in the life of India’s youth. This training will play an important role in creating a developed Bharat. From this point of view, the Pramod Mahajan Rural Skill Development Center scheme of Maharashtra is important, said Prime Minister Narendra Modi praising the skill development initiative of the state today.  Such skill development centers will prove to be temples of employment, said Chief Minister Eknath Shinde exuding confidence.
Prime Minister Narendra Modi today inaugurated through the videoconferencing system 511 Pramod Mahajan Rural Skill Development Centers set up in 350 taluks of the state by the State Government’s Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department.
On this occasion, Chief Minister Eknath Shinde, Dy CM Devendra Fadanvis, Dy CM Ajit Pawar, Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Minister Mangal Prabhat Lodha, State Chief Secretary Manoj Saunik, and others were present at the dais at the function held at Sahyadri Guest House. Similarly, public representatives, all revenue officers, district collectors, ZP CEOs and Senor Officers, Center Coordinators, and citizens were present at their respective centers and places. All these centers were connected to the main function through the videoconferencing system.
Mentioning the ongoing festival of Navratri and extending best wishes Prime Minister Modi said a mother cares for her son’s happiness and success. In such a pious atmosphere we are launching this innovative concept for training the youth. This will bring a new dawn in their life. There is a great demand for trained Bharatiya youth all over the world. The population of senior citizens is increasing in other countries across the world. According to a survey, there is a need for 40 lakh trained youth in about 16 countries across the world. They are in great demand in sectors like construction, health, tourism, hospitality, education and transport. Through such skill development programs we can create a trained manpower not only for Bharat but for the entire world, Modi said.
Making a mention of opportunities available in construction, modern agriculture, and entertainment-media sectors, Prime Minister Modi said that it would be in the right earnest to provide training in soft skills to those youth who want to try their luck abroad through these skill development centers of Maharashtra. In the past, skill development was taken that seriously, and therefore, due to the absence of training the youths had to suffer a loss though they had capacity and opportunities.
Now we have set up an independent ministry for skill development and made separate financial provisions for it. Crores of youths are being provided training through the Prime Minister Skill Development Centers. Even today, in many artisan families the legacy of traditional knowledge is handed down the generations in rural areas. They need support and backing. We are implementing the Vishwakarma Shram Sanman Yojana to provide support and backing to them. They are given modern equipment and good training. These 511 training centers in Maharashtra will be useful in extending the Vishwakarma Yojana, the Prime Minister exuded confidence.
In his speech, the Prime Minister made mention of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s thoughts on industrialization and the contribution of Kranti Jyoti Savitribai Fule in the field of women’s education without caring much for the social taboos and restrictions in vogue then. He said that through such skill training, the Dalits, Deprived and backward sections of the society get an opportunity to lead a respectable life. Therefore, these sections would be the most benefited ones through this training.  Now, modern farming can be done through drones. There is a chance in this for our womenfolk. They are being imparted training in the sector, he said.
Prime Minister Modi mentioned the opportunities available in the manufacturing sector, Industry 4.0, Service sector, natural farming, agriculture, industrial, and packaging sectors besides value addition chain and said that training in these sectors will open new avenues for the youth.
Skill development centers are employment temples in the state - CM Eknath Shinde
Stating that Prime Minister Narendra Modi alone has recognized the capacity of energetic youth power in the country, Chief Minister Eknath Shinde said that identifying youth as the greatest resource Prime Minister has launched the Skill India Mission. The percentage of joblessness has decreased in the last six years. Five thousand new ITIs were started in the country in the last nine years which would provide training to four lakh youth. By launching a revolutionary PM Vishwakarma scheme the traditional skill is endowed with the support of modern technology. In our budget, we have expressed our intention to start such centers in the rural areas of the state to check the outflow of the rural population to the cities. Accordingly, the draft of the Pramod Mahajan Skill Development Center was prepared on a war footing. Each center will train 100 candidates and together these centers will train 50,000 candidates. This will be our army of trained personnel who will conduct their business/jobs in tomorrow’s Maharashtra with respect and dignity, the Chief Minister said.
Chief Minister Shinde further said that these centers will play a pivotal role in training youth from rural and village backgrounds. This will include 30 percent of women. The artisans of rural areas too will get better training. We have increased the stipend of ITI students to Rs. 500. An MoU is signed with the TISS for the training and employment of 15000 candidates after the 12th. Start-ups are given various awards to encourage them. 75 virtual classrooms are started in State ITIs. Stating that over 12000 were given loans to start new enterprises under the Chief Minister Employment Generation Program, Chief Minister Shinde exuded confidence that Pramod Mahajan Rural Skill Development Centers will prove to be new temples of employment in the state.
The late Pramod Mahajan had a vision of modernization, Shinde said and added that 290 employment melas were organized in the state through which 1.40 lakh youth were provided employment. He expressed his commitment to continue to work to realize the dream of a strong Bharat as envisioned by Prime Minister Narendra Modi.
Will realize PM’s dream of Skill India : Dy CM Fadanvis
Deputy Chief Minister Fadanvis said that it was necessary to provide skill development training to the youth in the rural sector in view of the changing scenario and to make Bharat a world power. The good results of the mission launched by the Prime Minister are visible now all over the country. It is his vision that propelled us to start this skill development campaign in the country. Vishwakarma Scheme is the next step of this scheme. Bharat has emerged as the fifth largest economy in the world making available many opportunities for employment. We will soon become the third-largest economy in the world should we continue our strides in this field of progress and development. Today 511 Pramod Mahajan Skill Development centers are launched but we will not stop here only. This number will be increased in the state in the near future and take it to 5000 to realize the PM’s dream of Skill Bharat.
Revolution in rural Maharashtra through Skill Development Centers - Dy CM Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar said that the  Pramod Mahajan Rural Skill Development Centers will give the much-needed impetus to the state’s development. These centers will bring about a revolution in the employment sector in rural areas. It is the best thing that training commensurate with the new age development will be provided through these centers. This will accelerate the process of development of the state and the country as well. PM Vishwakarma Scheme is proving beneficial for rural artisans in the state. Maharashtra will be at the forefront of all the initiatives and programs launched to make our country a superpower, said Pawar.
Centers the gateway of bright future for youth - Minister Lodha
Skill, Employment, Entrepreneurship, and Innovation Minister Mangal Prabhat Lodha said that considering the priority accorded to Skill India by the Prime Minister, Maharashtra state is taking steps to provide skill training in all the villages. The 511 Pramod Mahajan Skill Development Centers will provide training in trades complimentary to the rural areas and also training in skills required at the global level. With this training there will be no need for any person to seek employment in the cities, he said adding that in such a way these centers will work to empower the youth and to contribute to the state’s development.
Earlier, floral tributes were paid to Bhagwan Vishwakarma, Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, and Mahatma Jyotirao Fule. Prime Minister Narendra Modi inaugurated the Pramod Mahajan Rural Skill Development Center by pressing the key. Chief Secretary Manoj Saunik conducted the proceedings while Additional Principal Secretary of Skill Development Department Ashish Kumar Singh proposed a vote of thanks.
About the Pramod Mahajan Rural Skill Development Centers
With a signature statement of ‘Kushal Maharashtra, Rojgaryukta Maharashtra’ the 511 centers will be operative in 350 talukas in the first phase at 511 gram panchayats. Rural youths to get training in employment and entrepreneurship. Training in traditional and professional fields complementary to agriculture. These centers will be useful for PM Vishwakarma Yojana.
Training on 2 job rolls will be provided at a time in these centers. The courses will be selected by the district skill, employment, and entrepreneurship guidance center that will be completed in three months (Minimum 200 and maximum 600 hours training period)
Each center will admit 100 candidates for 2023-24. Each center will have the provision of 30 percent women candidates and give them skill training. Thus, 50,000 youths will be trained through these centers every year. 
0000

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी




प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन.

महाराष्ट्राच्या संकल्पनेचे कौतुक, संधी-प्रशिक्षणांची सांगड महत्वपूर्ण

कौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

मुंबई, दि. १९:-  कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.


या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच राज्यभरातील ग्रामीण भागातील या कौशल्य विकास केंद्रांच्या ठिकाणी त्या-त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत महसूल विभागातील विभागीय महसूल अधिकारी, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठाधिकारी, केंद्रांचे समन्वयक तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही केंद्र दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्य समारंभास जोडण्यात आली होती. 


नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु असल्याचा उल्लेख करत आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा देतानाच पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, आईला आपल्या मुलाच्या सुख आणि यशाची काळजी असते. अशा या पवित्र काळात आपण युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने आगळी संकल्पना सुरु करत आहोत. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात नवी पहाट उदयास येईल. कारण जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगभरातील १६ देशांमध्ये ४० लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. अशा कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. 


बांधकाम, आधुनिक शेती तसेच मनोरंजन – माध्यम क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या संधीचा उल्लेख करून पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील या कौशल्य विकास केंद्रांतून 

विदेशात संधी आजमावू शकणाऱ्या तरुणांना काही सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देणेही उचित ठरेल. गत काळात कौशल्य विकास हा विषयच गांभीर्याने घेतला गेला नव्हता. त्यामुळे क्षमता आणि संधी असूनही युवकांना प्रशिक्षणाअभावी नुकसानच सहन करावे लागले. आता मात्र आपण कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे. कोट्यवधी तरुणांना पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. आजही ग्रामीण भागात कित्येक कारागिर कुटुंबात पारंपरिक ज्ञानाचा पुढे वारसा सोपवला जातो. त्यांना पाठबळाची, आधाराची गरज असते. त्यादृष्टीने आपण विश्वकर्मा श्रम सन्मान योजना राबवू लागलो आहोत. त्यांना आधुनिक उपकरणे आणि चांगले प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्रातील ही ५११ केंद्र या विश्वकर्मा योजनेला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.


यावेळी भाषणात पंतप्रधान श्री. मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या औद्योगिकरणाबाबतच्या विचारांचाही तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक बंधनांना झुगारून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, कौशल्य विकास आणि अशा प्रक्षिणातूनच दलित, वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रतिष्ठापुर्वक, सन्मानाने जगण्याची संधी मिळते. त्यामुळे याच घटकांना या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. आता ड्रोनद्वारेही आधुनिक शेती करता येता. यात आपल्या महिला भगिनींनाही संधी आहे. त्यांनाही या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, इंडस्ट्री फोऱ प्वाईंट ओ, सेवा क्षेत्र, नैसर्गिक शेती, कृषी औद्योगिक आणि या क्षेत्रातील मुल्यवर्धन साखळी, पॅकेजिंग अशा क्षेंत्रातील संधीचाही पंतप्रधान श्री. मोदी यांनी उल्लेख करून या क्षेत्रातील प्रशिक्षण युवकांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुले करतील असा विश्वास व्यक्त केला.


 

कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील ऊर्जावान युवाशक्तीची क्षमता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, युवा शक्ती मोठे संसाधन आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केले होते. गेल्या सहा वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. देशात गत नऊ वर्षात पाच हजार नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र – आयटीआय सुरु करण्यात आली. यातून चार लाख उमेदवारांना प्रशिक्षण मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा ही क्रांतिकारी योजना सुरू करून पारंपारिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आपण राज्याच्या अर्थसंकल्पात देखील ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात अशी केंद्रे सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार युद्ध पातळीवर यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा आराखडा तयार केला. प्रत्येक केंद्रातून १०० उमेदवार असे प्रत्येक वर्षी सुमारे ५० हजार कुशल उमेदवार तयार होतील. आपण बेरोजगारांची फौज असे नेहमी म्हणतो... पण ही आमची कुशल फौज असणार आहे. जे उद्याच्या महाराष्ट्रात सन्मानानं नोकरी व्यवसाय करीत असतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याच्या तळागाळात, ग्रामीण भागात, खेड्यातल्या युवकांचा कौशल्य विकास होईल. यात ३० टक्के महिला असतील. ग्रामीण भागातील कारागीरांना सुद्धा आणखी चांगले प्रशिक्षण मिळेल. आपण आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन वाढवून ५०० रुपये इतके केले आहे. बारावीनंतर १५ हजार उमेदवारांच्या रोजगार व शिक्षण-प्रशिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत करार केला आहे. स्टार्ट अप्सना विविध पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील आयटीआयमध्ये ७५ व्हर्चुअल क्लासरूम्स सुरु केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बारा हजाराहून अधिक नवीन उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना कर्ज दिल्याचे उल्लेख करून, ही प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे बनतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडे आधुनिकतेची दूरदृष्टी होती याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यात २९० रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्याद्वारे १ लाख ४० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत राहील, असेही ते म्हणाले.


पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू – उपमुख्यमंत्री फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारत महाशक्ती होण्यासाठी बदलत्या काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातदेखील कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाणे  गरजेचे आहे.प्रधानमंत्री यांनी कौशल्य विकासाचे जे काम सुरू केले आहे त्याचे चांगले परिणाम संपूर्ण भारतभर दिसत आहेत. माननीय पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने ही गरज ओळखून देशात कौशल्य विकास अभियान सुरू झाले आहे.  विश्वकर्मा योजना की त्याचाच पुढील टप्पा आहे. भारत ही जगातील  सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून नावा रूपाला आलेली आहे आणि त्यातूनही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपला देश अशाच प्रकारे प्रगती करत राहिला तर जगातील मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून लवकरच आपण झेप घेवू.५११  प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू झाली आहेत. इथेच आपण थांबणार नसून राज्यात आगामी काळात ही संख्या नक्कीच वाढवून  पाच हजार पर्यंत नेवू. पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू, असे ही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.


कौशल्य विकास केंद्रांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात रोजगार क्रांती – उपमुख्यमंत्री पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,राज्यात सुरू झालेली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही राज्याच्या विकासाला चालना देणारी ठरतील.ग्रामीण भागातील ही कौशल्य विकास केंद्र ग्रामीण रोजगारामध्ये क्रांती घडवून आणतील. या केंद्रामध्ये आधुनिक युगाला आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे  अत्यंत गोष्ट आहे.या केंद्राच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या विकासाला चालना देणारी ठरेल. पी.एम.विश्वकर्मा योजना ही राज्यातील ग्रामीण कारागिरांना आपल्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.देशाला महासत्ता बनवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना महाराष्ट्र राज्य आपल्याला सदैव आपल्या पाठीशी आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


केंद्र युवकांसाठी उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार – मंत्री लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा  म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला  प्राधान्य दिले असून  हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य देखील राज्यातील प्रत्येक गावागावात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी  प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये जी ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र होणार आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाला पूरक असणाऱ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचबरोबर जागतिक स्तरावर लागणाऱ्या योग्यतेचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. गावातून कोणत्याही व्यक्तीला रोजगारासाठी शहराकडे येण्याची गरज यामुळे भासणार नाही अशा प्रकारे नव्याने उभारलेल्या कौशल्य विकास केंद्रे राज्याच्या विकासासाठी आणि गावांना सक्षम करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.



सुरवातीला भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते कळ दाबून प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी सुत्रसंचालन केले. कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी आभार मानले.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राविषयी...

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन राज्यातील ३५० तालुक्यांमधील ५११ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ५११ केंद्र. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मिळणार. कृषिपूरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण. पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्र उपयुक्त ठरणार. या केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल.

अल्प कालावधीत (साधारणत: ३ महिने) पूर्ण होवू शकणारे (किमान २०० व कमाल ६०० तास प्रशिक्षणाचा कालावधी)  अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल.

प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात वर्ष २०२३-२४ करिता एकूण १०० उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान ३०% महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. या केंद्रातून दरवर्षी सुमारे ५० हजार  युवक-युवतीं कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होतील.

0000

श्री.तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा

                  


शारदीय नवरात्र महोत्सव - 2023

धाराशिव, शारदीय नवरात्र महोत्सवात आज 19 ऑक्टोबर रोजी गुरुवारी पाचव्या माळेच्या दिवशी श्री.तुळजाभवानी देवीची ललित पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री.तुळजाभवानी देवीचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.

               श्री. तुळजाभवानी देवीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री.देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. 

                   दररोज नियमित श्री. तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.उद्या 20 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 21 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 22 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.    ‌       तत्पूर्वी,काल 18 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री 10 वाजता चौथ्या माळेच्या दिवशी श्री.देवीजींची छबिना मिरवणूक गरुड वाहनावरुन काढण्यात आली.


                        ****

Wednesday 18 October 2023

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा


धाराशिव, तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज चौथ्या माळेच्या दिवशी श्री. तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री.भवानी मातेस दिला.याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                  

दररोज नियमित श्री.तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.१९ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा,२० ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. 

तत्पूर्वी काल (मंगळवार) रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला.त्यानंतर धूप आरती करण्यात आली.रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.प्रक्शाळ पूजा झाली. 


                         ***





Monday 16 October 2023

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

 

शारदीय नवरात्र महोत्सव-2023

 




धाराशिव, दि. 16 : (जिमाका)  तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली.शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. 

        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली.त्यानंतर आरती झाली.यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.श्री तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. 18 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, 19 ऑक्टोबर रोजी ललीत पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, 20 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 21 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 20 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.

तत्पूर्वी,काल (रविवार ) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक अश्व वाहनातून काढण्यात आली.

Sunday 15 October 2023

शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ श्री. तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

            





धाराशिव, दि.15 (जिमाका) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारपासून तुळजापूर येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री.तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री.तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज सपत्निक विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोपच्चाराने तसेच आई तुळजाभवानी उदो-उदोच्या जयघोषात पारंपारिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.

                 घट कलशांची पारंपारिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तीर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.shrituljabhavani.org ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सुलभ दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी श्री.तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन)सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, धार्मिक अधिकारी श्री.काटकर महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, चिलोजी बुवा, डॉ. अक्षय पाटील तसेच पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

****