Followers

Thursday 8 June 2023

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा संपन्न

मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समूहाच्या प्रतिनिधीशी

 चर्चा व क्षेत्र पाहणी






उस्मानाबाद : मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समूहातील नारिकांची प्रमुख मागणी त्यांना इतर मागासवर्गीय किंवा भटक्या जमाती मध्ये समाविष्ट करून घेण्याची आहे, अशा जाती समूहांना न्याय मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे अशा जात समूहांचा सामजिक मागासलेपणा सिध्द कण्यासाठी हा प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला आहे. त्यांना मागास प्रवर्गात आणुन व प्रमाण पत्र देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देण्यासाटी आयोगाची औरंगाबाद उपसमितीने जालना, बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वेक्षण केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ.गोविंद  काळे आणि प्रा.डॉ.निलिमा सरप (लखाडे) यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील इंदापूर आणि वाशी, कळंब येथील जूना पोलीस स्टेशन याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समुहाच्या लोकांशी सह्रदयतेने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत  क्षेत्र पाहणी केल्यानंतर दिली.

    यावेळी  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाटे, लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक संचालक दिलीप राठोड ,

 जिल्हा जात  प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबादचे उपायुक्त बलभीम शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक बाबसाहेब अरवत तसेच समाज कल्याण निरीक्षक युवराज भोसले , युवराज चव्हाण, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.

       डॉ.काळे आणि डॉ. सरप यांनी मुस्लिम तांबटकरी,शिकलकर,कलईगर या जात समूहातील व्यक्तींना त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांची सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांची जीवनशैली, राहणीमान, घराची स्थिती, रोजगार, व्यवसाय आणि संस्कृतीची निरीक्षणे नोंदविली. या जाती समूहाची लोक भटकंती करून आपला व्यवसाय करत असतात,त्यांचा मुख्य काम पितळ आणि तांब्याच्या भांड्यांना कलई करणे, वस्तूंना धार लावण्याचे असून सध्या या व्यवसाय आता फारसा चालत नाही तसेच कुठल्याही प्रकारच्या प्रवर्गात त्यांचा समावेश नसल्याने त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिशय खालवलेली आहे. या जात समूहातील नारिकांची प्रमुख मागणी त्यांना इतर मागासवर्गीय किंवा भटक्या जमाती मध्ये समाविष्ट करून घेण्याची असल्याचे सदस्यांनी सांगितले.

      यावेळी त्यांनी या जात समूहाच्या प्रतिनिधी, व्यक्तींशी चर्चा करत त्यांना स्थलांतरीत झाले असल्याचे सबळ पुरावे, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे जोडून राज्य मागासवर्ग आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या 'कुटुंबासाठी मुलाखत अनुसूची' या विहित नमुन्यात ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे सादर करावेत, अशी सूचना करुन  संबंधित गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी सदरील अर्जाचे प्रामाणिकरण करून घेतलेले अर्ज तहसीलदार यांच्याकडे जमा करावेत. संबंधित तहसीलदारांनी सदरील अर्ज महाराष्ट्र राज्य  मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात 15 दिवसांच्या आत जमा करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. जेवढी माहिती अचूक व पुराव्यानिशी दिली जाईल ती माहिती आयोगाकडून अहवालाद्वारे अधिवेशनात सादर करण्यात येऊन पात्र संबंधितांना या प्रवर्गाचा लाभ मिळवून दिला जाईल,  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         जिल्ह्यातील दौऱ्यात सदस्यांनी इंदापूर या गावातील शेख मोहियोद्दीन शिकलगर, शेख फैजोद्दीन चांदसाहब,मीना अनवर शिकलगर,दादा मियां शिकलगर,सुल्तान शिकलगर,समीना  यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. वाशी गावातील गफ्फार रज्जाक लोहार, हनीफ लोहार, शेख युसुफ लोहार, बाबमिल्या लोहार यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात संबंधित समुदायाचे व्यक्ती, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            

****

Wednesday 7 June 2023

‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'





मुंबईतील रस्ते स्वच्छकचरामुक्त करावेत 

मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छकचरामुक्त करावेतअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            दरम्यानमुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बंदरे विकास व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेखासदार राहुल शेवाळेमुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहलअतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेरस्त्यालगत असलेला कचराडेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइनवर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचराडेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावाअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकासप्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण

            मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडाएमएमआरडीएसिडकोमुंबई महानगरपालिकामहाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतीलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत.  दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.

अशी आहे 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइनसुविधा

            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातसार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावेकचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावीयासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइनकार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.

            भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावतसहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतरती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुनत्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.

            घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारीसूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीततसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रारसूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.

Monday 5 June 2023

उस्मानाबाद येथे जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी योजनेचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उदघाटन

  





उस्मानाबाद : शासनाने जाहीर केलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते,नागरिकांना कमी वेळेत एकाच छताखाली सर्व विभाग एकत्र आणून योजनांचा लाभ गतीमान पध्दतीने देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी ’ ही मोहिम राबविण्यात येत आहे.असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत  यांनी आज येथे केले.नगर परिषदेच्या नाटय गृहात आयोजित जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी या मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री सावंत बोलत होते.

यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे व इतर अधिकारी उपस्थित होते.

नागरीकाना सहकारी योजना व कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हे शासन आपल्या दारी  या उपक्रमाचा उद्देश आहे. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून  होत आहे. असे यावेळी पालकमंत्री म्हणाले

    यावेळी पालकमंत्र्यांनी नाटयगृहात  लावण्यात  आलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या स्टॉल्सवर भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आलेल्या नागरिकांना योजनेची माहिती द्यावी त्यांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे प्रयत्न करावे असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.

पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण 




            मुंबई  : विकास आणि पर्यावरण संवर्धन व जतन याला राज्य शासनाने महत्व दिले आहे. पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगासमुद्र किनारे आणि पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यातील नागपूरमुंबई,  महानगर प्रदेश विकास प्राधिकरणछत्रपती संभाजीनगररत्नागिरी आणि नाशिक या शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असून ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून सन 2024 पर्यंत 5 हजार कोटींचा निधी उभारण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. कांदळवनाच्या जतन आणि संवर्धनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात 18 नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित केली आहेत. नागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

            पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते 'माझी वसुंधरा ३.०'  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईआमदार संजय गायकवाडआमदार राजेंद्र राऊतपर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेस्वीत्झर्लंडचे उच्चायुक्त मार्टिन मेयरआबासाहेब जऱ्हाडविजय नाहटा  यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी- अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीनिरोगी आयुष्यासाठी पर्यावरण महत्वाचे आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत. देशात पर्यावरणीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे आगळे - वेगळे स्थान आहे. निसर्ग सौंदर्यानी नटलेले आपले राज्य असून हा अनमोल ठेवा आपल्याला जतन करावयाचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. देशात पर्यावरणीय दृष्टीने राज्याचे महत्व आगळे - वेगळे असून निसर्गाचे वरदान आपल्याला लाभले आहे. पश्चिम घाटसमुद्रकिनारासह्याद्री पर्वतरांग हा आपला अनमोल ठेवा असून  त्याचे जतन ही काळाची आणि समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रकल्प पुढे नेताना पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास महत्त्वाचा असून आर्थिक विकास करताना निसर्गाचे संवर्धन व समतोल राखून प्रकल्प आपण करतो आहोत. पर्यावरण पूरक विकास हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा अविभाज्य अंग आपण मानले आहे. राज्यात सौरऊर्जाजलपवन ऊर्जा या क्षेत्रात सरकारने तीस हजार कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. ग्रीन हायड्रोजनग्रीन अमोनिया तसेच पवन ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमाझी वसुंधरा 3.0 च्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्या या सकारात्मक कामगिरीमुळे आज 174 कोटी रुपयांचे बक्षीस या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थाअधिकारी यांचा पुढाकार निश्चितपणे महत्वपूर्ण आहे. पंचमहाभूतांच्या संवर्धनात मोलाची कामगिरी करून माझी वसुंधरा अभियान 3.0 आपण राबविले. या अभियानाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आलीही कौतुकास्पद बाब आहे. 16 हजार 714 नवीन हरित क्षेत्र राज्यात तयार केली आहेत.

            जागतिक स्तरावर वातावरणीय बदलाची चर्चा सुरू आहे दावोस मध्ये झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेवेळीही हाच चर्चेचा विषय होता. तापमान वाढसमुद्राच्या पाणी पातळीत वाढजैव प्रजाती नष्ट होण्याच्या घटनेत वाढअन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबतच्या समस्या असे धोके निर्माण होत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाबाबत सजग आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन आपण काम करत आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी  लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पर्यावरण पूरक समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा 33 लाख झाडे आपण लावणार आहोतअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            या कार्यक्रमावेळी ‘माझी वसुंधरा 4.0’ च्या लोगोचे अनावरणनोंदणीसाठी पोर्टलचे अनावरणयुनिसेफच्या पुस्तिकेचे प्रकाशनविज्ञानधारा मासिकाचे प्रकाशनमुख्यमंत्री श्री. शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकरमहसूल मंत्री श्री. विखे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            या वेळी सेंटर फॉर वॉटर सॅनिटेशन यासह विविध सामंजस्य करार करण्यात आले.

माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध संस्थांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये राज्यस्तरावरील पुरस्कारांमध्ये अमृत शहरे (१० लाखावरील लोकसंख्या) गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथमनवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकावला.

            अमृत शहरे (३-१० लाख लोकसंख्या) गटात मीरा भाईंदर मनपाअहमदनगर मनपा आणि पनवेल मनपाने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

अमृत शहरे (१-३ लाख लोकसंख्या) गटात सातारा नगरपालिकाबार्शी नगरपालिका आणि भुसावळ नगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत (५० हजार ते १ लाख लोकसंख्या) गटात कराड नगरपरिषदलोणावळा नगरपरिषद आणि बारामती नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत (२५ हजार ते ५० हजार लोकसंख्या) गटात गडहिंग्लजमोहोळ आणि शिर्डी नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या) गटात दहिवडीमालेगाव आणि निफाड नगर पंचायतीनी अनुक्रमे प्रथम तीन पुरस्कार पटकावले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या) गटात पाचगणीपन्हाळा आणि महाबळेश्वर नगरपरिषद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.

ग्रामपंचायत ( १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) गटात मंद्रूप (सोलापूर)गुंजाळवाडी ग्रा. पं. ( अहमदनगर)  आणि विंचुर ग्रा.पं. (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

ग्रामपंचायत ( ५ ते १०  हजार लोकसंख्या) गटात बोराडी (धुळे)धरणगुट्टी (कोल्हापूर) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

ग्रामपंचायत ( २.५ ते ५  हजार लोकसंख्या) गटात वाघोली (अहमदनगर)जवळगाव (नांदेड) आणि घाटनांद्रे (सांगली) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

ग्रामपंचायत ( २.५ हजार लोकसंख्या पेक्षा कमी) गटात शिरसाठे (नाशिक)सिंदखेड (बुलढाणा) आणि मन्याची वाडी (सातारा) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

            भूमी थीमॅटिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये विविध गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकामीरा भाईंदर महानगरपालिकासातारा नगरपरिषदलोणावळा नगरपरिषदगडहिंग्लज नगरपरिषददहिवडी नगरपंचायतपांचगणी नगरपरिषदसोनई ग्रामपंचायतबोराडी ग्रामपंचायतवाघोली ग्रामपंचायतशिरसाठे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले.

            यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे),  राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

            सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे)रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

            सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद गटात जितेंद्र डूडी (सांगली)आशिष येरेकर (अहमदनगर) आणि श्रीमती आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. दराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.    

00000

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


        मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकरअभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेसुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली. ज्येष्ठ अभिनेते देवानंदराजेश खन्नाअमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणा-या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेमजिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहेया शब्दांत राज्य शासनाच्यावतीने सुलोचनादीदींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेआपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्यात्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेलअशा शब्दात श्री. फडणवीस यांनी विनम्र श्रद्धाजली अपूर्ण केली.  

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सुलोचनादीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.