Followers

Thursday 31 October 2019

लातूर विभागात एकता दौड ला उर्त्स्फूत प्रतिसाद


        




लातूर :  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' ( एकता दौड) चे आयोजन करण्यात आले होते. या दौड ला लातूर विभागात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला आहे.  हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस  म्हणून साजरा केला जातो.
लातूर येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी एकता दौड  ला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. ही दौड जिल्हा क्रीडा संकुल येथून शिवाजी चौक (ब्रीज वरुन)  हुतात्मा स्मारक (टॉऊन हॉल)  मैदानावर आली. या दौड मध्ये शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी, खेळाडू, नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी  ऊस्फुर्त सहभाग घेतला . या दौड मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
हुतात्मा स्मारक मैदानावर सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची  पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित नागरिकांना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.या एकता दौड मध्ये लातूरकर नागरिक मोठया संख्येने सहभागी होऊन दौडला ऊस्फूर्त प्रतिसाद दिला. दौडचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला.
उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही दौड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून सुरु होवून बार्शी नाका-लेडीज क्लब-छ.शिवाजी हायस्कूल-त्रिशरण चौक-आंबेडकर पुतळा या मार्गाने जावून पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाली व समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. या संपूर्ण दौड दरम्यान सहभागी मान्यवरांनी  राष्ट्र प्रेम व्यक्त होणाऱ्या, देशाच्या एकात्मतेविषयी प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा दिल्या.
 या राष्ट्रीय दौडमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, पोलीस उपअधीक्षक मोतीराम राठोड, श्रीमती शेख,कार्यकारी अभियंता अनिल सगर, उपअभियंता श्री. गपाट, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, उपसंचालक आत्माराम मलगुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, यांच्यासह उस्मानाबाद शहरातील युवा मंडळ,क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 नांदेड येथे एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधू, स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंघ परिहार, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, नेहरु युवा केंद्राचे कुलदिपसिंघ, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सुमित डोडल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते. तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
    हिंगोली येथे  एकता दौड ची सुरुवात अग्रसेन चौक - बसस्टँड - इंदिरा गांधी चौक - महात्मा गांधी चौक पर्यंत करण्यात आली. यावेळी एकता दौड ला हिंगोली शहराचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राज्य राखीव बलाचे समादेशक मंचक इप्पर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. यावेळी राज्य राखीव बलाचे अतिरिक्त समादेशक आर.बी. जाधव, नायब तहसीलदार एम.जी खंडागळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुकी, क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, मारोती सोनकांबळे, शारीरिक शिक्षण संघटनेचे रमेश गंगावणे, योग विद्यालयाचे रत्नाकर महाजन, आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  कलीमोद्दीन फारुकी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या एकता दौड मध्ये राज्य राखीव बलाचे जवान, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, खेळाडु, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, पत्रकार बंधू आदी सहभागी झाले होते.
                                                
                                                       000000

Wednesday 30 October 2019

पदवीधर मतदारांनी लवकर नाव नोंदणी करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर


 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ ‍निवडणूक
          औरंगाबाद, दिनांक ३० (जिमाका) – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी राजकीय पक्षांशी आज संवाद साधला. तसेच सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पदवीधर मतदार नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.
विभागीय आयुक्त यांच्या दालनात श्री. केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त ‍शिवाजी ‍ शिंदे,  उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी ०१ ऑक्टोबरपासून जाहीर केलेला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी परीक्षेची, पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे. शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
           प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ‍विभागातील सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे यांनी पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करावी.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रशिक्षण
जिल्हाधिकारी  कार्यालयात 31 ऑक्टोबर 2019 रोजी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण होणार आहे.
******

लातूर विभागात एकता दौड ची तयारी पूर्ण


लातूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस  म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय,  शाळा,  महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड,  आणि हिंगोली अशा चारही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि.31 ऑक्टोबर रोजी ‘एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर येथून गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर 2019  रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला टाऊन हॉल येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे.ही यशस्वी करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि विविध विभागांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 वाजता ही दौड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून सुरु होवून बार्शी नाका-लेडीज क्लब-छ.शिवाजी हायस्कूल-काळा मारुती चौक-ताजमहल टॉकीज-शिवाजी पुतळा या मार्गाने जावून पोलीस मुख्यालय येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. जिल्हाभर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा, राष्ट्रीय एकतेची शपथ तसेच उस्मानाबाद येथे राष्ट्रीय एकता दौड,संचलन,जनजागृतीपर कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद, कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, रोटरी क्लब, आर्ट ऑफ लिव्हिंग, मराठवाडा साहित्य परिषद शाखा,उस्मानाबाद, एकता फाऊंडेशन तसेच उस्मानाबाद शहरातील युवा मंडळ,क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचा सहभाग असणार आहे. 
 नांदेड येथे सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार असून जुना मोंढा टॉवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी आवाहन केले आहे.
हिंगोली येथून सकाळी 7 वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला अग्रसेन चौक ( नांदेड नाका ) येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड बस स्थानक-इंदिरा गांधी चौक-महेश चौक मार्गे महात्मा गांधी चौक येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. 

Tuesday 29 October 2019

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी राज्यभर एकता दौड



मुंबई, दि. 29 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवसम्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.
नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा शुभारंभ होणार आहे. 21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल.
धुळे येथे सकाळी 8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा शुभारंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने  31 ऑक्टोबर रोजी स. 8.00 वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे. 
विदर्भात नागपूर येथे ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  मैदानावर सकाळी 8 वाजता  सुरु होणार आहे. अकोला येथे ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. बुलडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल.  याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday 24 October 2019

लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित





लातूर,दि.24, (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.  
अ. क्र.
विधानसभा मतदार संघाचे नाव
विजयी उमेदवाराचे नाव
पक्ष
मिळालेली एकूण मते
1
234-लातूर ग्रामीण
श्री. धीरज विलासराव देशमुख
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
135006
2
235-लातूर शहर
श्री. अमित विलासराव देशमुख
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
109548
3
236-अहमदपूर
श्री. बाबासाहेब मोहनराव पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
84636
4
237-उदगीर (अ.जा.)
श्री. संजय बाबूराव बनसोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
96366
5
238-निलंगा
श्री. संभाजी दिलीपराव पाटील
निलंगेकर
भारतीय जनता पार्टी
97324
6
239-औसा
श्री. अभिमन्यू दत्तात्रय पवार
भारतीय जनता पार्टी
92731

              लातूर  दि.24, (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी उमेदवारांची नावे व उमेदवारांना मिळालेली मते यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
234- लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार श्री. धीरज विलासराव देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री. सचिन उर्फ रवि रामराजे देशमुख यांच्यापेक्षा 1 लाख 21 हजार 482 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अर्जून धोंडिराम वाघमारे (महाराष्ट्र नव निर्माण सेना) 2 हजार 912 मते, खंडेराव लिंबाजी भोजराज(बहुजन समाज पार्टी) 813 मते , धीरज विलासराव देशमुख (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 1 लाख 35 हजार 06  मते, सचिन ऊर्फ  रवी रामराजे देशमुख(शिवसेना) 13 हजार 524 मते, जलील यासीन अत्तार (बहुजन मुक्ती पार्टी) 662 मते, डोणे मंचकराव बळीराम (वंचित बुहजन आघाडी) 12 हजार 966 मते, दगडुसाहेब व्यंकटराव पडीले (लोकराज्य पार्टी) 494 मते, बालाजी हणमंत गोडसे (राष्ट्रीय मराठा पार्टी) 898 मते, शंकर गणपत सोनवणे (बहुजन विकास आघाडी) 313 मते, अरविंद महादेव गाडे (अपक्ष) 492 मते, एकुर्के बाजीराव दत्तात्रय (अपक्ष) 547  मते, गडगले राजकुमार मारोती (अपक्ष) 383 मते, बब्रुवान बळीराम पवार (अपक्ष) 1496 मते, श्रीनिवास अंगदराव अकनगिरे (अपक्ष) 576 मते, सचिन माधव पाणढवळे (अपक्ष) 1017 मते आणि नोटाला 27 हजार 500 मते मिळाली आहेत.
235-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार श्री. अमित विलासराव देशमुख हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांच्यापेक्षा 40 हजार 321 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अमित विलासराव देशमुख (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) 1 लाख 9 हजार 548 मते, कांबळे मधुकर संभाजी (बहुजन समाज पार्टी) 739 मते, शैलेगोविंदकूमार लाहोटी (भारतीय जनता पार्टी) 69 हजार 227 मते, अखीक रहेमान अ.जलील मोमीन (इंडियान युनियन मुस्लिम लिग) 497 मते, जयराज सुर्यंकांत सह्याद्री (राष्ट्रीय मराठा पार्टी) 146 मते, बंडुसिंग गुलाबसिंग भट (बहुजन मुक्ती पार्टी) 151 मते, राजासाब बाशुमियाँ मणियार (वंचित बहुजन आघाडी) 24 हजार 298 मते, राम शंकर पाटोळे (बहुजन विकास आघाडी) 254 मते, आल्टे विश्वनाथ महादेव (अपक्ष) 87 मते, छोटु किशनराव हिबारे (अपक्ष) 116 मते, व्दारकाधिश ऊर्फ दिनेश गोविंद पारीख (अपक्ष) 158 मते, पठाण मिनहाज खान असिफ खाँ (अपक्ष) 83 मते, फिरोज खान साजिद खान पठाण (अपक्ष) 127 मते, बाबासाहेब गोरोबा सितापूरे (अपक्ष) 175 मते, मनोजकुमार उर्फ दिनेश जुगलकिशोर गिल्डा (अपक्ष) 485 मते, विकास जीवन सूर्यवंशी (अपक्ष) 497 मते, लातूरश्री विठ्ठल उर्फ शशिपंकज (अपक्ष) 655 मते, श्रीराम किसनराव गोमारे (अपक्ष) 92 मते, संतोष संभाजी साबदे (अपक्ष) 257 मते, नोटाला 710 मते मिळाली आहेत. (235-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या माहितीचा वरील उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.)    
  236-अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. बाबासाहेब मोहनराव पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. जाधव पाटील विनायकराव किशनराव यांच्यापेक्षा 29 हजार 191 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
जाधव पाटील विनायकराव किशनराव (भारतीय जनता पार्टी) 55 हजार 445 मते, ॲड. तिगोटे बालाजी संभाजी (बहुजन समाज पार्टी) 621 मते, बाबासाहेब मोहनराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 84 हजार 636 मते, अयोध्या अशोक केंद्रे (वंचित बहुजन आघाडी) 22 हजार 141 मते, ताहेर हुसेन मैनोद्दीन सय्यद (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) 1 हजार 996 मते, ॲड. रियाझ अहेमद निसार अहेमद सिध्दिकी (इंडियन युनियन मुस्लिम लीग) 973 मते, चंद्रकांत साहेबराव जाधव (अपक्ष) 806 मते, दिलीप राजेसाहेब देशमुख (अपक्ष) 45 हजार 846 मते, ज्ञानोबा सोपान जरीपटके (अपक्ष) 755 मते, नोटा-1 हजार 762 मते मिळाले आहेत.
  237-उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. संजय बाबूराव बनसोडे हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. अनिल सदाशिव कांबळे यांच्यापेक्षा 20 हजार 579 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अनिल सदाशिव कांबळे (भारतीय जनता पार्टी) 75 हजार 787 मते, काशिनाथ गुनाजी काळे (बहुजन समाज पार्टी) 963 मते, संजय बाबुराव बनसोडे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी) 96 हजार 366 मते, अतुल अभिमन्यू धावारे (वंचित बहुजन आघाडी) 2 हजार 599 मते, बालाजी केशव कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी) 417 मते, संजय सोपानराव कांबळे (बहुजन विकास आघाडी) 496 मते, कमलाकर प्रभाकर कांबळे (अपक्ष) 223 मते, धोंडीबा इरबा नामवाड  (अपक्ष) 310 मते, नरसिंग पांडुरंग घोणे  (अपक्ष) 456 मते, प्रदीप प्रल्हाद कांबळे  (अपक्ष) 318 मते, बालाजी हिरामन गडकर  (अपक्ष) 281 मते, शोभा सुशिल मोतीराम  (अपक्ष) 349 मते आणि नोटा- 1 हजार 97 मते मिळालेली आहेत.  
  238- निलंगा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यापेक्षा 32 हजार 131 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
अशोकराव शिवाजीराव पाटील (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) 65 हजार 193 मते, राजाराम विठ्ठल कांबळे (बहुजन समाज पार्टी) 907 मते, संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर (भारतीय जनता पार्टी) 97 हजार 324 मते, अरविंद विरभद्रप्पा भातांब्रे (वंचित बहुजन आघाडी) 29 हजार 819 मते, अंकुशराव शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी) 478 मते, रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी (बहुजन विकास आघाडी) 249 मते, अन्वरखाँ सत्तारखाँ पठाण (अपक्ष) 438 मते, शेषेराव रामा कांबळे  (अपक्ष) 345 मते, श्रीमंत निवांत उसनाळे  (अपक्ष) 641 मते, राजकुमार विठ्ठल सस्तापूरे  (अपक्ष) 652 मते आणि नोटाला 1 हजार 272 मते मिळाली आहेत.
239- औसा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. अभिमन्यू दत्तात्रय पवार हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. बसवराज माधवराव पाटील यांच्यापेक्षा 25 हजार 647 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघात उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.
प्रा.डॉ. अनिल सुग्रीव कांबळे (बहुजन समाज पार्टी) 760 मते ,अभिमन्यू दत्तात्रय पवार (भारतीय जनता पार्टी) 92 हजार 731 मते, बसवराज मधवराव पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) 67 हजार 84 मते,अभिमन्यू शेषराव पवार (संभाजी ब्रिगेड पार्टी) 1 हजार 75 मते, सुधीर शंकरराव पोतदार(वंचित बहुजन आघाडी) 8 हजार 49 मते, आकाश प्रकाश पाटील (अपक्ष) 279 मते, गौसुदीन उस्मान शेख (अपक्ष) 164मते, नितीन पंडितराव बंडगर (अपक्ष) 210 मते, पांडुरंग मुरलीधर चेवले (अपक्ष) 215 मते, बंजरंग भुजंगराव जाधव (अपक्ष) 9 हजार 431 मते, बसवराज पाटील  (अपक्ष) 398 मते, बसवराज पाटील (अपक्ष) 269 मते, मनोहर आनंदराव पाटील (अपक्ष) 797 मते, रामकिशऊर्फ बालाजी मनोहर जाधव 494 मते आणि नोटाला 764 मते मिळाली आहेत.