Followers

Sunday 31 December 2023

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



मुंबई, दि. ३१ : प्रदूषण कमी करण्यासाठी  पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महास्वच्छता अभियान राज्यभर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो


मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.


स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणाली व्दारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला. 

तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली.

*****

Friday 8 December 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रा’मुळे गावोगावी शासकीय योजनांचा जागर





·        जिल्ह्यात 786 ग्रामपंचायतींमध्ये उपक्रमाचे नियोजन

·        5 डिसेंबरपर्यंत 221 गावांमध्ये पोहचला संकल्प यात्रा रथ

लातूर : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जात असून लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 5 डिसेंबरपर्यंत 221 गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहचली असून 1 लाख 1 हजार 774 नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि शहरी भागासाठी नगर विकास विभाग ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ समन्वयक म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यात्रेच्या स्वागतासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचे 15 डिसेंबरपर्यंतचे गावनिहाय नियोजन

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. अहमदपूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी शिंदगी बु., दुपारी किणी कदु, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी सावरगांव थोटदुपारी हंगरगा, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी उन्नी जांबदुपारी हाडोळती, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी आनंदवाडी, दुपारी सय्येदपूर खु.,  12 डिसेंबर2023 सकाळी बोडकादुपारी आंबेगाव, 13 डिसेंबर2023 सकाळी कुमठा बु.दुपारी कौडगाव, 14 डिसेंबर2023 सकाळी बाबळदरा, दुपारी शिवणखेड, 15 डिसेंबर2023 सकाळी वायगाव आणि दुपारी गादेवाडी येथे ही यात्रा जाईल.

औसा तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी जयनगर,  दुपारी आपचूंदा, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी किनीथोटदुपारी येळी, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी भंगेवाडीदुपारी सारोळा, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी एरंडी, दुपारी आलमला, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी सततधरवाडीदुपारी उंबडगा बु., 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी उंबडगा खु.दुपारी उटी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी लखनगाव, दुपारी काळमाथा, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी कवठा केज, दुपारी भेटा येथे भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

चाकूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी उजळंब,  दुपारी भाटसांगवी, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी बनसावरगावदुपारी बोळेगाव, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी तिवटघाळदुपारी तीवघाळ,  11 डिसेंबर2023 रोजी सकाळी अजन्सोंडा, दुपारी जानवळ, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी रायवाडीदुपारी रामवाडी, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी केंद्रेवाडी खु.दुपारी महाळंगी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी झरी, दुपारी दापक्याळ, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी शिवणी म. केज आणि दुपारी हाडोळी येथे यात्रा जाणार आहे.

देवणी तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी गुरनाळ,  दुपारी गौडगाव, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी बटनपूरदुपारी लासोना, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी बोरोळदुपारी सिंध्दीकामठ, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी हंचनाळ, दुपारी वागदरी, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी अजनीदुपारी संगम, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी सावरगावदुपारी होनाळी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी भोपनी, दुपारी मानकी, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी डोंगरेवाडी, दुपारी नेकनाळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाईल.

जळकोट तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी रावणकोळादुपारी हळद वाढवणा, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी पाटोदा बु.दुपारी कोळनुर, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी सोनवळादुपारी कोनाळी डोंगर, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी मंगरुळ, दुपारी बोरगाव, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी लाळी खु.दुपारी बेळसांगवी, 13 डिसेंबर2023 सकाळी येवरीदुपारी लाळी बु., 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी ढोरसांगवी, दुपारी धामणगाव, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी हावरगा आणि दुपारी येलदरा येथे यात्रा जाणार आहे.

लातूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी भातखेडा,  दुपारी ममदापूर, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी भाडगावदुपारी रमजनापूर, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी उमरगादुपारी बोरी, 11 डिसेंबर2023  रोजी सकाळी शिवणी खु . दुपारी सेलू बु., 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी धनेगावदुपारी सोनवती, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी बाभळगावदुपारी सिरसी, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी कातपूर, दुपारी सिंकदरपूर, 15 डिसेंबर2023  रोजी सकाळी मळवटी आणि दुपारी कोळपा येथे विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार आहे.

निलंगा तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी हंद्राळ व अंबुलगा,  दुपारी हालसी हा व शेंद, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी हणमंतवाडी व निटूरदुपारी वाडीकासारशिरसी व ताजपूर, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी कोराळी व डांगेवाडीदुपारी नेलवाड व ढोबळेवाडी, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी मिरगनहळही व कलांडी, दुपारी देवीहल्लाळी व बसपूर, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी ममतदापूर व केळगावदुपारी तांबाळा व खडकउमरगा,  13 डिसेंबर2023 रोजी सकाळी कासार बालकुंदा व दापका, दुपारी पिरुपटेलवाडी व लांबोटा, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी चिलवंतवाडी व गुऱ्हाळ, दुपारी मोळगाव क  आणि जाऊ, 15 डिसेंबर2023 रोजी सकाळी कलमुगळी  व जाजणूर, दुपारी टाकळी आणि तळीखेड येथे संकल्प यात्रेंतर्गत उपक्रम होतील.

रेणापूर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी बिटरगाव,  दुपारी फरदपूर, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी गरसुळी, दुपारी वाला, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी तत्तापूरदुपारी कामखेडा, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी कोळगाव, दुपारी निवाडा, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी शेरादुपारी कुंभारी, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी सुमठाणादुपारी समसापूर, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी गव्हाण दुपारी हरवाडी,   15 डिसेंबर2023 रोजी सकाळी सेलू, दुपारी जवळगा विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी अजनी बु.,  दुपारी कळमगाव, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी होनमाळ,  दुपारी बेवनाळ, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी हालकीदुपारी तळेगाव बोरी, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी उमरदरा, दुपारी वांजरखेडा, 12 डिसेंबर2023 सकाळी हिसामाबाददुपारी डोंगरगाव बोरी, 13 डिसेंबर2023 सकाळी अंकुलगा सय्यददुपारी तुरुकवाडी, 14 डिसेंबर2023 सकाळी हाणमंतवाडी, दुपारी कांबळगाव, 15 डिसेंबर2023 सकाळी आनंदवाडी, दुपारी हिप्पळगाव येथे यात्रा जाईल.

उदगीर तालुक्यात 8 डिसेंबर2023 रोजी सकाळी दिग्रस,  दुपारी करडखेल, 9 डिसेंबर2023 रोजी सकाळी हेरदुपारी कुमठा, 10 डिसेंबर2023 रोजी सकाळी लोहारादुपारी मलकापूर, 11 डिसेंबर2023 रोजी सकाळी तिवटग्याळ, दुपारी हैबतपूर, 12 डिसेंबर2023 रोजी सकाळी तोंडारदुपारी लोणी, 13 डिसेंबर2023 रोजी सकाळी सोमनाथपूरदुपारी क्षेत्रफळ, 14 डिसेंबर2023 रोजी सकाळी हंगरगा, दुपारी होणीहिप्परगा, 15 डिसेंबर2023 सकाळी डाऊळ आणि दुपारी डोंगरशेळकी येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

**

Monday 4 December 2023

मालवण येथे आयोजित नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती भारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण

 


"आपल्या नौदलातील जवानांच्या समर्पणाला भारत वंदन करतो"

"सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो"

वीर छत्रपती महाराज बळकट नौदलाचे महत्त्व जाणून होते

"नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावरील नवीन मानचिन्ह शिवाजी महाराजांचा वारसा प्रतिबिंबित करतील "

सशस्त्र दलांमध्ये आपल्या नारी शक्तीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

"भारताकडे विजयशौर्यज्ञानविज्ञानकौशल्य आणि आपल्या नौदल सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास आहे"

"किनारपट्टी भागातील लोकांचेजीवनमान सुधारण्याला प्राधान्य"

"कोकण हा अभूतपूर्व संधी असलेला प्रदेश आहे"

"वारसा आणि विकास हाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे"

नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणभारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद - मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग, दि. 4 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजेपाणबुड्याविमाने आणि विशेष दलांची थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.

            यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कीमालवणतारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले. सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले कीत्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रेमायाजी नाईक भाटकरहिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानानी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील कारण हे नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत पंतप्रधानांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

140 कोटी भारतीयांचा विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे कारण भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि पूर्ण दृढनिश्चयाने ती साध्य करण्यासाठी झटत आहे असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांतील लोक ‘ राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होत असल्यामुळे संकल्पभावना आणि आकांक्षा यांच्या एकत्रित सकारात्मक परिणामांची झलक दिसून येत आहे असे पंतप्रधान म्हणाले. आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे. नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल असे ते म्हणाले.

भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना पंतप्रधान म्हणाले कीहा इतिहास केवळ गुलामगिरीपराभव आणि निराशेबद्दलचा नसूनत्यामध्ये भारताचे विजयधैर्यज्ञान आणि विज्ञानकला आणि सृजनशीलताकौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीचअशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदरआणि सुरत येथील 80 पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला. चोल साम्राज्याने आग्नेय आशियाई देशांपर्यंत आपला व्यापार वाढवला होतात्याचे श्रेय पंतप्रधानांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला दिले. परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे सर्वात प्रथम भारताची सागरी क्षमता बाधित झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले कीजो भारत नौका आणि जहाजे बनवण्यासाठी प्रसिद्ध होतात्याने समुद्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि त्यामुळे सामरिक-आर्थिक ताकदही गमावली. भारत विकासाकडे वाटचाल करत असतानाआपण आपले गमावलेले वैभव परत मिळवायला हवेयावर भर देत पंतप्रधानांनी ब्लू इकॉनॉमीअर्थात नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी 'सागरमालाप्रकल्पाअंतर्गत बंदराच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की भारत 'मेरिटाइम व्हिजन', अर्थात सागरी दृष्टीकोना अंतर्गत आपल्या महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी माहिती दिली की सरकारने व्यापारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी नवीन नियम बनवले आहेतत्यामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या 140 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. सध्याच्या काळाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "हा भारताच्या इतिहासाचा असा काळ आहेजो केवळ 5-10 वर्षांचा नव्हेतर येणाऱ्या अनेक शतकांचे भविष्य लिहिणार आहे." ते म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या स्थानावरून झेप घेततो पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहेआणि तिसऱ्या स्थानाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. जग भारताचा विश्व मित्र (जगाचा मित्र)’ म्हणून उदय होताना पाहत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले कीइंडिया मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर सारख्या उपायांमुळे हरवलेला मसाल्याचा मार्ग पुन्हा निर्माण होईल. त्यांनी मेड इन इंडियाचे सामर्थ्य स्पष्ट करतानातेजसकिसान ड्रोनयूपीआय प्रणाली आणि चांद्रयान-3 यांचा उल्लेख केला.

परिवहन विमानेविमानवाहू जहाज INS विक्रांतच्या उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता देखील दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती भागातील गावांनादेशातील शेवटचे गावअसे संबोधण्या ऐवजी, ‘देशातील पहिले गाव’ समजण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना मोदी म्हणाले, "आजकिनारपट्टी भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे." 2019 मध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची निर्मिती आणि या क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून, 2014 नंतर मत्स्य उत्पादनात 8 टक्के आणि निर्यातीत 110 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवायशेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण 2 लाखावरून वरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्य साखळीच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सागरमाला योजना किनारपट्टी भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) मजबूत करत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत असून त्यामुळे किनारपट्टी भागात नवे व्यापार आणि उद्योग सुरु होतील. मत्स्य प्रक्रियेशी संबंधित उद्योग आणि मासेमारी नौकांचे आधुनिकीकरणही हाती घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

कोकण हा अभूतपूर्व संधींचा प्रदेश आहेअसे पंतप्रधान म्हणाले. या राज्याच्या विकासासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सिंधुदुर्गरत्नागिरीअलिबागपरभणी आणि धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनचिपी विमानतळाचे कार्यान्वयन आणि माणगावपर्यंत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा उल्लेख केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला. खारफुटी व्यवस्थापनासाठी मालवणआचरा-रत्नागिरी आणि देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची निवड करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

वारसा आणि विकासहाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले कीकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढून नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतीलअसे पंतप्रधानांनी नमूद केले.

संबोधनाचा समारोप करतानापंतप्रधानांनी दिल्लीबाहेर लष्कर दिननौदल दिन इत्यादीसारखे सशस्त्र सेना दिन आयोजित करण्याच्या नवीन परंपरेबद्दल सांगितले कारण यामुळे या सोहोळ्याची व्याप्ती भारतभर वाढते आणि नवीन ठिकाणे आकर्षणाचे नवीन केंद्र ठरतात.

नौदल दिनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणभारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ही बाब आपल्या सर्वांच्या गौरवाची आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रेचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व तमाम महाराष्ट्रासाठी गौरवाची अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिवपराक्रमाने पावन झालेल्या शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

आज संपूर्ण महाराष्ट्रच नाहीतर राष्ट्र शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहे. या ऐतिहासिक पूर्वसंध्येला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्राची पहिली नौदल अधिकारी म्हणून श्रीमती देवस्थळी यांची नेमणूक झाली आहे याचाही तमाम महाराष्ट्राला अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले देशातील महिलांच्या आत्मनिर्भरतेच प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालं आहे. आत्मनिर्भरतेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा आणि वसा आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहे. आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आलाय. आता आपल्या सामर्थ्याची नोंद संपूर्ण जगाने घेतलेली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैसमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसंरक्षण मंत्री राजनाथ सिंहकेंद्रीय सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारसंरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहाननौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदुर्ग येथील नौदल दिन 2023’ सोहोळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करतोज्यांच्या राजमुद्रेद्वारे नवीन नौदल चिन्हाची प्रेरणा मिळालीज्याचा स्वीकार गत वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या जलावतरणावेळी करण्यात आला.

दरवर्षीनौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजेपाणबुड्याविमाने आणि विशेष दले यांच्याद्वारे कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-डोमेन कार्यान्वयनाच्या विविध पैलूंचे साक्षीदार बनण्याची संधी देतात. असे राष्ट्रीय सुरक्षेतील नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकतात आणि नागरिकांमध्ये सागर विषयक जाणीव-जागृती करतात.

पंतप्रधानांनी अनुभवलेल्या क्रियात्मक प्रात्यक्षिकांमध्ये कॉम्बॅट फ्री फॉलहाय स्पीड रन्सस्लिदरिंग ऑप्स ऑन जेमिनी अँड बीच असॉल्टएसएआर डेमोव्हीईआरटीआरईपी आणि एसएसएम लाँच डिलसीकिंग ऑप्सडंक डेमो आणि सबमरीन ट्रान्झिटकामोव्ह ऑप्सन्यूट्रलायझिंग एनिमी पोस्टस्मॉल टीम इन्सर्शन - एक्स्ट्रॅक्शन (एसटीआयई ऑप्स)फ्लाय पास्टनेव्हल सेंट्रल बँड डिस्प्लेकंटिन्युटी ड्रिलहॉम्पाइप डान्सलाइट टॅटू ड्रमर्स कॉल आणि सेरेमोनिअल सनसेट यांचा समावेश होता. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Sunday 3 December 2023

अण्णासाहेब पाटील महामंडळामुळे दिनेशचा शेती, कॉलेज ते मेडीकल व्यवसाय

 यशोगाथा :



धाराशिव : कोणतेही काम करण्याची इच्छाशक्ती असली आणि त्याला परिश्रम करण्याची जोड मिळाली की कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते. हे धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रहिवासी असलेल्या दिनेश पाटीलने सिध्द करुन दाखविले आहे. घरच्या शेतीत वडीलांना मदत करुन शिक्षण घेतांना पुढे त्या शिक्षणातूनच व्यवसाय थाटून युवा वर्गापुढे आदर्श निर्माण केला आहे. मेडीकल स्टोअर्स सुरु करुन स्वत: स्वावलंबी होवून तीन जणांना रोजगारदेखील दिनेशने उपलब्ध करुन दिला आहे.
दिनेशने सन २००८ ते 20१२ या कालावधीत शिक्षण घेत असतांना घरच्या शेतीच्या कामांमध्ये वडिलांना मदत केली. शेती करत असतांना दिनेशच्या असे लक्षात आले की, शेतीला पुरक व्यवसायाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण शिक्षण घेतलेल्या फार्मसी अभ्यासक्रमाचा उपयोग केला पाहिजे. हे लक्षात घेऊन दिनेशने सन 2013 मध्ये धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनसमोर मेडिकल व्यवसाय सुरू केला. कुठलाही व्यवसाय म्हटले की, अडचणी हया आल्याच. त्या अडचणींना सामोरे जाऊन दिनेशने काही काळ व्यवसाय सुरळीत व चांगला सुरु ठेवला. या कालावधीमध्ये व्यवसायात वाढ होत गेली. सन २०१८ ते 2023 या पाच वर्षांमध्ये व्यवसायाचा आलेख वाढतच गेला.
वाढत्या व्यवसायाला आवश्यकता होती ती अत्याधुनिक होण्याची. त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणूकीसाठी पैसा उभारायचा कोठून याबाबत एके दिवशी दिनेशने वडीलांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी रक्कम आणायची तर कोठून हा प्रश्न निर्माण झाला. दिनेशला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. दिनेशने निश्चय केला, की या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यावर जो काही कर्जाचा व्याज परतावा आहे, त्याचे व्याज महामंडळाकडून आपल्याला आपला बँकेचा हप्ता भरल्यानंतर परत मिळतो.
त्यासाठी दिनेशने थेट धाराशिव येथील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्यालय गाठून महामंडळाच्या कर्जाविषयीची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत घुले यांना भेटून घेतली. श्री. घुले यांनी दिनेशला महामंडळाच्या कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. या महामंडळाचे कर्ज घेण्याचा निर्णय दिनेशने घेतला. त्यासाठी त्याने पुढील बँकेची कर्ज मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढून घेतले. पंजाब नॅशनल बँकेत जाऊन कर्ज उपलब्धतेबाबत माहिती घेतली. बँकेकडून दिनेशला कर्ज उपलब्धतेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पूर्वी बँकेबद्दल सगळीकडे नकारात्मक चर्चा ऐकून होता. पण तसे काहीच नसल्याचे दिनेशला बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले. उलट बँकेच्या व्यवस्थापकाने दिनेशला कर्ज उपलब्ध करुन देण्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहित केले.
बँकेच्या व्यवस्थापकांनी दिनेशला महामंडळांतर्गत 9 लक्ष 75 हजार रुपयांचे 2018 ला कर्ज मंजूर केले. महामंडळाच्या धाराशिवमधील सुरुवातीचा काळातील लाभार्थ्यांपैकी दिनेशही एक लाभार्थी होता. मिळालेल्या कर्जामधून दिनेशला मेडिकल स्टोअर्स अत्याधुनिक पद्धतीचे करायचे होते. बदलत्या काळानुसार त्यासाठी दिनेशने घेतलेल्या कर्जातून फर्निचर, कॉम्प्युटर, फ्रीज, प्रिंटर व उपलब्ध होणाऱ्या विविध औषधी या गोष्टी खरेदी केल्या. त्यानंतरच्या काही काळातच व्यवसाय वाढतांना दिसला. सध्या दिनेशकडे तीन कामगार काम करतात. तीन कामगारांना 15 हजार रुपये देऊन महिन्याकाठी दिनेशला 35 हजार रुपये शिल्लक राहतात. या महामंडळाची एक चांगली गोष्ट अशी की, आपण बँकेला वेळेवर हप्ता भरायचा. भरलेला हप्ता महामंडळाकडे क्लेम करायचा. महामंडळ आपला क्लेम पाहून व चालू व्यवसायाचा फोटो पाहून आपल्याला त्या महिन्याचा व्याज परतावा करते.
दिनेशला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबद्दल कळल्यापासून त्याचे मित्रमंडळी व नातेवाईकांमध्ये योजनेबद्दल दिनेशने माहिती दिली. त्यातील आज अनेक जण या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करीत आहे. मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाकडे वळायला हवे. व्यवसायासाठी लागणारे जे काही भांडवल आहे, ते बँकेकडून उपलब्ध झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याचा लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वांनी आपल्या व्यवसायाचे आयटीआर सीबील व्यवस्थित ठेवणे आवश्यक असल्याचे दिनेशने सांगीतले.

Thursday 16 November 2023

मराठा समाजातील युवकांना रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग दाखविणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

 विशेष लेख:



मराठा समाजातील बेरोजगार युवक युवतींना उद्योग/व्यवसाय उभारण्यास मदत करून त्यांना रोजगारातून स्वावलंबनाचा मार्ग दाखविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेचा परतावा महामंडळ करते.
मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासाला महामंडळाच्या योजनेअंतर्गत या घटकातील युवक-युवतीना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जदार युवका-युवतींनी उद्योगासाठी घेतलेले व्याज महामंडळ भरते.यामुळे व्यवसाय उभारणीसाठी युवक-युवतींना दिलासा मिळतो. मराठा समाजातील या युवक युवतींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ काम करते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या कर्जाच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय,दुग्ध व्यवसाय,शेळीपालन,व्यवसायिक वाहने,मेडिकल,कृषी सेवा केंद्र,हॉटेल मालवाहतूक वाहने,ट्रॅक्टर,किराणा दुकान,फुटवेअर,टेलरिंग दूकान, मेडीकल असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहे.
जिल्ह्यातील मराठा समाजातील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगारातून स्वावलंबनाच्या मार्गाची कास धरावी.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव

‘सारथी’च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेतून घडले 304 अधिकारी

 योजना ‘सारथी’च्या...



· पुणे येथे दरवर्षी राज्यातील 750 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा दुसरा भाग...
‘सारथी’मार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठीही मोफत प्रशिक्षणाची योजना राबविली जाते. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील लक्षीत गटातील उमेदवारांना राज्य सेवेतील विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याची संधी मिळावी, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे. गेल्या तीन वर्षात म्हणजेच 2020 पासून या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले 304 उमेदवार राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी म्हणून दाखल झाले आहेत. सुरुवातीला दरवर्षी 250 उमेदवारांना या परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येत होते, गतवर्षी या सख्येत वाढ करण्यात आली असून आता दरवर्षी 750 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या 70 उमेदवारांचा सन 2020 मध्ये राज्य सेवा परीक्षेच्या अंतिम निवड यादीत समावेश होता. यापैकी पहिल्या पाच जणांमध्ये ‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेतलेले चार उमेदवार होते. तर 2021 मध्ये ‘सारथी’च्या योजनेतून प्रशिक्षण घेतलेले 104 उमेदवार अंतिम निवड यादीत होते. त्यामध्ये 5 उपजिल्हाधिकारी, 6 पोलीस उपअधीक्षक, 5 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पदावर रुजू झाले. तांत्रिक सेवेमध्ये कृषि सेवेसाठी 67, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 35, यांत्रिकी अभियांत्रिकीसाठी 16 आणि वन सेवेसाठी 10 उमेदवारांची निवड झाली. गेल्या तीन वर्षात 74 उमेदवार वर्ग-1 चे अधिकारी, तर 230 उमेदवार वर्ग-2 चे अधिकारी म्हणून सुरु झाले आहेत.
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाती कोणत्याही शाखेतील पदवीधारक, तसेच एमपीएससी राज्य सेवा परीक्षा देण्यासाठी पात्र उमेदवार या योजनेचा लाभ घेवू शकतात. ‘सारथी’मार्फत किंवा इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांकडून राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा उमेदवाराने लाभ घेतलेला नसावा.
एमपीएससी राज्य सेवा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील संस्थांची निवड केली आहे. चाळणी परीक्षेद्वारे राज्यातील दरवर्षी विद्यार्थ्यांची निवड या प्रशिक्षणासाठी केली जाते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यासाठी प्रशिक्षणाचे देण्यात येते. पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे 8 महिन्यांचा आहे. मुख्य परीक्षा कालावधी सुमारे 3 महिने आणि मुलाखत तथा व्यक्तिमत्व चाचणी प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे एक महिन्याचा असतो.
प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांना पुस्तके आणि इतर आकस्मिक खर्चासाठी एकरकमी 10 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. पूर्व परीक्षा प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या वर्गातील उपस्थिती व चाचणी गुणानुसार दरमहा मासिक 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. पूर्व-परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी निशुल्क कोचिंगसोबतच वर्गातील मासिक हजेरी आणि चाचणी गुणांनुसार 15 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी ‘सारथी’च्या संचालक मंडळाने निश्चित केलेली रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जाते.
एमपीएससी परीक्षा प्रशिक्षण योजनेच्या प्रमुख अटी
उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला तथा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले नॉन-क्रिमीलेअर, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा ईडब्लूएस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जातात. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित ‘सीईटी’मध्ये प्राप्त गुणांद्वारे केली जाते. या गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीद्वारे पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र अथवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पदवी प्रमाणपत्र, दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो.
प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची संधी
सन 2023-24 मध्ये ‘सारथी’च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
- तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

मराठा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सक्रिय ‘सारथी’ ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था’

विशेष लेख:


राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना,उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासन करत असते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या,युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे. सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम,योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 तर शिक्षण विभागातंर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 जणांना फायदा झालेला आहे.
संरचना आणि निधीची तरतूद :
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच सारथीचे राज्यात 8 विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली Indian Companies Act 2013 & Rules कंपनी कायदा - 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबध्द त-हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करण्यात येते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. सारथी संस्थेचे संस्थापन समयलेख Memorandum of Association & Article of Association (MoA व AoA) हे Registrar of Companies यांचेकडे चार जून 2018 रोजी नोंदणीकृत केले असून त्यामध्ये नमूद तीन मुख्य उद्दिष्टे व 82 पूरक उद्दिष्टानुसार संस्थेचे कामकाज चालू आहे.
सारथीमार्फत राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक प्रगतीच्या योजना
महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग
या उपक्रमातंर्गत सारथीमार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षांच्या पूर्व,मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परिक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा 13 हजार व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रु.विद्यावेतन दिले जाते.तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
उपयुक्तताः- आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत एक हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटीचा लाभ डिबिटी द्वारे देण्यात आला आहे. युपीएससी मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पन्नास हजार रु.एकरकमी दिले जातात. सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांना झूम मिटींगद्वारे मार्गदर्शनही करण्यात येते. त्यांच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर त्या सोडवण्यात येतात. आत्ता पर्यंत मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3.25 कोटीचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रु.एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाखाचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.
यशस्वीताः-
युपीएससी परिक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात बारा,आयपीएस मध्ये 18 तर आयआरएस सेवेत आठ आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकुण बारा अशा सारथीमधील 51 विद्यार्थ्यांची युपीएससी परीक्षेत निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच युपीएससी सीएपीएफ सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन –
युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परिक्षा अर्थात एमपीएससीमध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन,कोचींग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससी साठी साडे सातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
उपयुक्तताः-
आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत 1125 विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेसाठी 8.26 कोटीचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार एक रकमी दिले जातात.आत्तापर्यंत मागील तीन वर्षात 7367 विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी अकरा कोटी रुपयांचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.तसेच मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहा हजार रु.एकरकमी दिले जातात.त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखत द्वारेही मार्गदर्शन केल्या जाते.मुलाखतीची सर्व तयारी करुन घेण्यात येते.
यशस्वीताः-
मागील तीन वर्षांत 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 56.60 लाखाचा लाभ डिबीटीद्वारे देण्यात आला आहे.सारथीच्या मार्गदर्शातून सन 2021-22,23 या वर्षात वर्ग एक श्रेणीमध्ये 74 तर वर्ग दोन श्रेणीत 230 अशा एकूण 304 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.
उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती :
डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जूलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती :
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जूलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF)
या अतंर्गत सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे/ विकसित करणे. संशोधन पुर्ण होईपर्यंत परंतू कमाल पाच वर्षाच्या कालावधी करिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह रू.31,000/- अधिछात्रवृत्ती देण्यात येते. यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकुण 2109 विद्यार्थांचा सहभाग आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(csms-deep) राबवण्यात येतो. दि.1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36,525 अर्जांपैकी अंतिम छाननीतुन सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या 27,346 इतकी आहे.
छत्रपती राजाराम महाराज - सारथी शिष्यवृत्ती 2022-23 योजना
यामध्ये एकूण 31.23 कोटी रु. वाटप करण्यात आले आहे. यासाठी इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, दहावी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.800 प्रमाणे वार्षिक रू.9600/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. तर मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF)- सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण,कापनीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन,शेड नेट हाऊस व्यवस्थापन,वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 रोजी देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून प्रशिक्षणाचे राज्यातील 26 ठिकाणी सुरवात करण्यात येईल. याचे वार्षिक लाभार्थी हजार असणार आहेत.
सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत 35 सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत वीस हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले आहे. विद्यार्थी नोंदणी सुरु असून 186 अर्ज प्राप्त झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध वयोगटातील एकूण 61 हजार 535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 5290 विद्यार्थ्यांना 10.25 लक्ष रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहेत. तसेच करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरांचे ही राज्यभरात विविध जिल्ह्यांत आयोजन केल्या जाते. ज्याचा विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.
विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना
या सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथी मार्फत श्रीमंत मालोजीराजे - सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद,पुणे,कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरात ही 3 जूलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्यावत,आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक रेडी टू वर्क मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.
अशा विविध पद्धतीने सारथी मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव