05-औरंगाबाद पदवीधर निवडणूक कार्यक्रम-2020
Followers
Wednesday 25 November 2020
मतदान केंद्रावर मुक्कामी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा दयाव्यात -जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत
मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास पर्यायी 9 प्रकारचे पुरावे ग्राह्य
छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध तर 8 अर्ज अवैध
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020
मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा
पदवीधर मतदारसंघ निवडणूक
आदर्श आचार संहितेचे पालन करावे - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
Tuesday 24 November 2020
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर आदर्श आचारसंहितेचे अमंलबावणी करावी-जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी
जिल्ह्यातील 16 हजार 276 मतदारांसाठी 39 मतदान केंद्रावर मतदान होणार
05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी जी.श्रीकांत
Wednesday 21 October 2020
शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे पाठीशी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्व शक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- मी नुकसानग्रस्त
भागाची पाहणी करायला आलो असून या भागातील शेतकऱ्यांचे
खुप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी खचलेले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांनी धीर
धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्व शक्तीपणाला
लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांशी
संवाद साधताना दिला.
तुळजापूर तालुक्यातील
कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या
जमिनीची दि.21 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली आणि गावातील
शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतच्या प्रागंणात संवाद
साधुन त्यांची आसवे पुसत त्यांना धीर दिला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन
मंत्री संदीपान भुमरे, जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
प्रा.अस्मिता कांबळे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.कैलास घाडगे-पाटील,आ.
ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे, अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे,उपसरपंच दिपक सोनवणे
आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री
ठाकरे म्हणाले की, सद्या ताबडतोबीने काय करायचे ? आम्ही या भागातील कुठून व कशा प्रकारचे नुकसान झाले आहे
हे पाहीले असल्यामुळे एकही नुकसानग्रस्त शेतकरी
पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी व्यवस्थीतरित्या नुकसानीचे पंचनामे
करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असून
निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल असे आश्वासनही
त्यांनी दिले.
यावेळी प्रातिनिधीक
स्वरूपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अपसिंगा येथील अर्चना
युवराज पाटील, सुवर्णा लोके, हिराबाई दत्तु कटकधोंड यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी
30 हजार रूपयांचे धनादेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान
मुख्यमत्रयासह सर्व मंत्री महोदयांनी अपसिंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला
***
Wednesday 30 September 2020
मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कोरोनामुळे होणा-या मृत्युदराचे प्रमाण शुन्य टक्क्यावर आणण्याचा निर्धार- डॉ. तात्याराव लहाने
मुंबई दि. 30 : शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, माता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतु, जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचा-यांना कोरोनाने ग्रासले होते, मात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरिब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असून, पुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन), स्वच्छता निरीक्षक आदींसोबत वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी उत्तम काम केले आहे. सुरुवातीला कोविड-१९ संदर्भात अधिक माहिती नसल्याने अनेक अडचणींना आणि रूग्णांच्या मृत्युला सामोरे जावे लागत होते. मात्र, या परिस्थितीतही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. सुरुवातीला तीनच लॅब होत्या मात्र आज १५४ लॅब, १४९० व्हेंटीलेटर, १६५० आयसीयु बेड, तीन लाख सात हजार बेड, १८ मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत. सुरुवातीला मृत्युदर ५० टक्के होता. आज २.६ टक्के आहे आणि हाच मृत्युदर शुन्य टक्क्यावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गतही काम सुरू असून, शुन्य टक्के मृत्युदरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लवकरच पुर्ण करू, असेही डॉक्टर लहाने यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, राज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
Monday 28 September 2020
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू - कृषि मंत्री दादाजी भुसे
नांदेड (जिमाका) दि. 27:- मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधतो आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील कासारखेडा या गावातील शिवारांची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पूरभाजी तुकाराम शिंदे या शेतकऱ्याने कृषि मंत्र्यांचे लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबिन हातचे गेले आहे. शिंदे व इतर शेतकऱ्यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषि विभागाला दिले.
परभणी, हिंगोली आणि आता नांदेड येथील अतिवृष्टीच्या भागात मी पाहणी करत असून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे -कृषिमंत्री दादाजी भुसे
नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पहाणी