उस्मानाबाद, दि.16 (जिमाका) :- जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालय
व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीकरिता नागरिकांची गर्दी मोठया
प्रमाणात होते व याठिकाणी दस्त नोंदणीचे कामकाजासाठी बायोमेट्रीक यंत्रणेचा वापर केला
जात असल्याने कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हयातील
सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. 14 एप्रिल 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेशित
केले होते .
महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविला
आहे आणि भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा
कालावधी दिनांक 3 मे, 2020 पर्यंत वाढविला
आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार
कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक
उपाययोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद
जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय
व दुय्यम
निबंधक श्रेणी 1 कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. 3 मे, 2020 पर्यंत
बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या
आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन दैनंदिन अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर
करणे बाबत सह जिल्हा निबंधक, उस्मानाबाद यांना आदेशित करण्यात आले आहे.
या आदेशाचे
उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम
2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय,
कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी
तात्काळ लागू करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment