Followers

Saturday 18 April 2020

जीवनावश्यक वस्तुंसाठी हिंगोली नगर परिषदेचे ॲप लॉकडाऊनच्या कालावधीत हिंगोली शहरातील नागरिकांना उपलब्ध होत आहेत ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू



राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या आरोगयाच्या हितासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरीकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत गरजवंताना जीवनाश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून नियोजन केले आहे.
लॉकडाऊनमुळे हिंगोली नगरवासियांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू जसे की, किराणा, भाजीपाला, फळे, दूध औषधी खरेदीची घरपोच सेवा देण्यासाठी नगर परिषद हिंगोलीद्वारे ‘दिनदयाळ उपाध्याय अंतोदय राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान’ अंतर्गत मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे आता हिंगोलीकरांना सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध करुन देवून लॉकडाऊच्या कालावधीत दिलासा देण्याचे काम केले आहे.
सद्याच्या आधुनिक युगात शहरातील गरीब व पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या जसे की नळ दुरुस्ती, गॅस दुरुस्ती, लाईट फिटींग, सायकल तसेच मोटारसायकल मेकॅनिक, किराणा, भाजीपाला, फळ, औषधी दुकानदार आदी लोक आपला व्यवसाय व उपजीविका वाढविण्यासाठी महागड्या जाहिराती व विपणन कार्य (Marketing Activities) असे व्यवसाय वाढीस लागणाऱ्या युक्ती भांडवलाच्या कमतरतेमुळे करु शकत नाहीत. त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या दररोजच्या कामावर अवलंबुन असतो, त्यामुळे दैनंदिन काम भेटले तर त्यांची उपजीवीका सुरळीत चालते. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने अशाच शहरी भागातील गरीब व दारीद्र्य रेषेखालील नागरिकांचे राहणीमान उंचवण्याकरिता व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता ‘दिनदयाळ उपाध्याय अंतउदय राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान’ राबवीत आहे. या अभियानातंर्गत स्थानिकपातळीवर नगरपंचायत, नगरपरिषद तसेच महानगरपालिकाद्वारे सीएलसी सेंटर (CITY LIVEHOOD CENTER) म्हणजेच शहरी उपजिविका केंद्र स्थापन करीत आहेत. जेणे करुन असे व्यवसायिक व सदर अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सेवा व उत्पादीत झालेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे. म्हणून डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हिंगोली नगर परिषदेने ‘डिजिटल नगर परिषद उपक्रम’ हाती घेतला असून सर्व जिवनावश्यक गोष्टी या ॲपद्वारे मिळण्यास सुरुवात झाली आहे. आणि याचा फायदा हिंगोली नगरवासीयांना या लॉकडाऊच्या कालावधीत होत आहे.
लॉकडाऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडावे लागत होते. आणि यामुळे अनेकदा सोशल डिस्टंसींगचा देखील प्रश्न उद्भवत होता. याकरीता हिंगोली नगरपरिषदेमार्फत विकसीत करण्यात आलेले  ॲप्लिकेशन कोणत्याही ॲन्ड्रॉईड मोबाईलवर ‘हिंगोली नगर परिषद’ या नावांचे ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपद्वारे नागरिकांना आपली नोंदणी करुन जीवनावश्यक वस्तू जसे किराणा, भाजीपाला, फळे, दूध औषधींची आपली मागणी नोंदवीता येणार आहे. मागणी केलेले सामान घरपोच झाल्यानंतर बील कॅश ऑन डिलेव्हरी करता येणार आहे. लॉकडाऊनच्या कालाधीत या ॲपचा नागरिकांना फायदा होत आहे. तसेच नागरिकांना घरातच बसूनच जीवनावश्यक वस्तूंची मागणी करता येत आहे. यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडणार नाहीत. तसेच सोशल डिस्टंसींगचा देखील  प्रश्न उद्भवणार नाही.
या ॲपचा हिंगोली शहरातील नागरिक फायदा घेत असून, या ॲपद्वारे ते आपल्या जीवनावश्यक वस्तुंची मागणी नोंदवीत आहे. आतापर्यंत हिंगोली शहरातील 120 किराणा, भाजीपाला, फळे, दूध औषधी आदी दूकानदारांनी तर 610 नागरिकांनी या ॲपवर आपली नोंदणी केली आहे. या ॲपद्वारे नोंदणी केल्यापैकी किराणासाठी 159, भाजीपालाकरीता 220, फळांसाठी 27, दूध 14 औषधींकरीता 37 जणांनी घरपोच वस्तूंची मागणी केली आहे. यामुळे हिंगोली शहरातील नागरिक घराच्या बाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करीत असल्याचे चित्र आहे. या सुविधेकरीता नागरिकांनी हिंगोली नगर परिषदेचे आभार व्यक्त केले आहे.             

No comments:

Post a Comment