लातूर जिल्हा पुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात
यश मिळवले आहे. या योजनेचे 88 हजार 933 लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात आजपर्यंतचे
उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. या योजनेअतंर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या नावाने
गॅसजोडणी (कनेक्शन) अगदी 100 रुपयात दिले जाते. लातूर जिल्हयाचे पालकमंत्री संभाजी
पाटील-निलंगेकर आणि जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखली जिल्हा
प्रशासनाने डिसेंबर, 2018 अखेर संपूर्ण जिल्हा धूरमुक्त करण्याचा निश्चय केला आहे .
उज्वला गॅस जोडणीअंतर्गत
सध्या चाकूर तालुक्यातील अलगरवाडी, लातूर तालुक्यामधील ताडकी, खाडगाव, सारसा,
अहमदपूर मधील वैरागड, कोळवाडी, गिलेवाडी, नांदूरा बुजूर्ग, उदगीर केरोसीनची मागणी
होत नाही. सध्या जवळपास 75 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गॅस जोडणीदारास गॅस
वापर करण्यासाठी देखील प्रवृत्त केले जात आहे, असे पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी
आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले.
-- मीरा ढास
सहायक
संचालक (माहिती)
विभागीय
माहिती कार्यालय, लातूर
No comments:
Post a Comment