* शासन दिव्यांग कल्याण धोरण लवकरच जाहीर करणार
* दिव्यांग व्यक्ती कायदा -2016 प्रभावी अंमलबजावणी व्हावी
* संवेदना बहुविकलांग केंद्राचे काम उतकृष्ट
लातूर,दि.27:- सामाजिक न्याय
विभाग व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त्
विद्यामाने राज्याच्या प्रत्येक जिल्हयात दिव्यांगाना
रोजगार उपलब्ध् व्हावा याकरिता कौशल्य विकास
केंद्रे सुरु करण्यात येणार असून या माध्यमातून
जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध् होईल, असे प्रतिपादन सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील संवेदना बहुविकलांग केंद्रात राष्ट्रीय बहुदिव्यांगता जनसशक्तीकरण
संस्था चेन्नई, जनकल्याण समिती पुणे,
अधिवक्ता परिषद लातूर व सक्षम नागपूर यांच्या संयुक्त् विद्यामाने आयोजित दिव्यांग व्यक्ती समानहक्क समान संधी
कायदा-2016 वरील दोन दिवशीय कार्यशाळेचे
उद्घाटन प्रसंगी श्री. बडोले बोलत होते.
या वेळी
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर , खासदार सुनील गायकवाड, चेन्नईच्या राष्ट्रीय बहुदिव्यांगता संस्थेचे संचालक
हिमांशू दास, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, अशोक कुकडे, सुजित देशपांडे, जिल्हा
परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सक्षम नागपूर संस्थेचे डॉ. सुकुमार
आदिसह विविध मान्यवर, विचारवंत उपस्थित होते.
सामाजीक न्यायमंत्री बडोले म्हणाले की, कौशल्य
विकास विभागाच्या सहकार्याने दिव्यांगाना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक जिल्हयात रोजगार
उपलब्ध् करण्यासाठी दिव्यांगाची
कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. दिव्यांगाना विविध साहित्य पुरवठा करणे व त्यांच्यासाठी योजना आखणे याबरोबरच समाजात
दिव्यांग व्यक्ती निर्माण होऊ नये याकरिता
शिघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु केली जाणार असून लातूरसाठी ही एक केंद्र मंजूर करत असल्याचे श्री. बडोले यांनी जाहीर केले. राज्यातील एक ही दिव्यांग
व्यक्ती दिव्यांगतत्व प्रमाणपत्राच्या
अभावी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये याकरिता झिरो पेंडन्सी हा उपक्रम प्रशासनाने हाती घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
सामाजीक न्याय विभाग लवकरच राज्यातील
सर्व दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राज्य दिव्यांग कल्याण धोरण जाहीर करणार आहे, असे
सांगून दिव्यांग व्यक्ती समान हक्क समान संधी कायदा -2016 अंतर्गत देण्यात
आलेल्या सर्व तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी
करुन दिव्यांगाना याचा लाभ मिळवून दिला
जाईल, अशी ग्वाही ही श्री. बडोले यांनी दिली.
तसेच लातूर येथील संवेदना बुहुविकलांग केंद्रामार्फत सामाजीकतेची जाणीव ठेवून दिव्यांग व्यक्तींसाठी चांगले काम केले जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.
शासनाने ठरवून दिलेला सर्व निधी दिव्यांग व्यक्तींवर प्रत्यक्ष खर्च झाला पाहीजे
याकरिता शासकीय यंत्रणेने योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री निलंगेकर
म्हणाले की, दिव्यांग व्यक्ती समान हक्क समान संधी
कायदा-2016 अंतर्गत 5 टक्के निधी प्रत्येक
विभागाने खर्च केला पाहीजे असे सांगितले.
लातूर जिल्हयातील 13 हजार दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रे
विविध ठिकाणी शिबीरे लावून दिली जात आहेत.व ही सर्व प्रमाणपत्रे 3 डिसेंबर 2018 पर्यंत
दिली जातील. दिव्यांग व्यक्तींची सर्वकष माहिती गोळा करणे, प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करणे व सर्व ग्रामसेवकांची यासाठी कार्यशाळा, घेणारी लातूर जिल्हा परिषद ही राज्यात पहिली आहे, असे त्यांनी सांगितले. दिव्यांगासाठी
स्वतंत्र औद्योगीक प्रशिक्षण संस्था निर्माण करुन दिव्यांगाना तंत्र कुशल केले जाईल,
असे ही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र व राज्य शासन दिव्यांगासाठी विविध योजना व नोकरीत आरक्षण ठरवून
देत असतात परंतु प्रत्यक्षात योजनांची
व आरक्षणांची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नाही. याकरिता शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत व समाजात दिव्यांग व्यक्तींचे सर्व प्रकारे समावेशीकरण व्हावे,
अशी अपेक्षा श्री. दास यांनी व्यक्त केली. तर जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनमार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी केलेल्या कामाची माहिती देऊन दिव्यांगाच्या हक्कासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी खासदार सुनील गायकवाड , अशोक कुकडे यांचीही
भाषणे झाली.
प्रारंभी ना. बडोले, ना. निलंगेकर व सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर अरुण डंके यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय दिला. यावेळी दिव्यांग
मतदार आकाश यांना मतदार कार्ड वर बीज भांडवल योजनेचा दिव्यांग लाभार्थी रोहिदास
राठोड यांना धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संवेदनाच्या स्मरणिकेचे
प्रकाशन तर प्रा. संजय गवई यांच्या पुस्तिकेचे
विमोचन ही मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यशाळेच्या आयोजना उद्देश सुरेश पाटील यांनी प्रास्ताविकात
सांगून संवेदना बहुविकलांग केंद्रामार्फत
राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची
माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रीती पोहरेकर यांनी केले तर आभार जगन्नाथ चिताडे यांनी मानले.
दिव्यांगाना साहित्य वाटप:-
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शिरुर ताजबंद ता. अहमदपूर येथे सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांगाना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच अहमदपूर
नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या सिध्दार्थ
कॉलनी, इंद्रा नगर, येथील सामाजीक सभागृहाचे
उद्घाटन श्री. बडोले यांच्या हस्ते
करण्यात आले. यावेळी खासदार सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, आमदार सुधाकर भालेराव,
सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत जिल्हा परिषद समाज
कल्याण अधिकरी मिनगीरे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment