Followers

Wednesday, 10 August 2016

पाणी आडवा- पाणी जिरवा मोहिम कायमस्वरुपी राबविली पाहिजे.
                                                         -विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे






          औरंगाबाद, दि.10- मराठवाड्यात यशस्वी शेती करण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापराबरोबरच मोठ्या प्रमाणावर पाणी आडवा- पाणी जिरवा ही मोहिम कायमस्वरुपी राबविली पाहिजे असे मत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील शेतीचे भवितव्य या एक दिवसीय कृषी परिषदेच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते.
            यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, उद्योजक राम भोगले  व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, राज्य शासनाचा कृषी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र  चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर आणि इस्टीटयुशन ऑफ ॲग्रीकल्चरल टेक्नॉलॉजीस्टस, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने मराठवाड्यातील शेतीचे भवितव्य या एक दिवसीय कृषी परिषदेचे  आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य नाट्यगृहात करण्यात आले होते. दोन सत्रात चाललेल्या या परिषदेचा सायंकाळी समारोप झाला.
श्री. बागडे पुढे म्हणाले की, आजच्या परिस्थित गटशेती यशस्वी होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी गटशेतीवर जास्तीतजास्त भर देण्याची गरज आहे. शेती व्यवसाय बरोबरच शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु झाले पाहिजेत, त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर प्रक्रिया उद्योगाचे शिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे मराठवाड्यात  प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहू शकतात. असे त्यांनी सांगितले.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर आपल्या मनोगतात म्हणाले की,  शेतीचे भवितव्य या विषयावर मराठवाड्यात ही पहिली कृषी परिषद असून असे उपक्रम आयोजित करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शेतीसाठी या परिषदेचा निश्चित उपयोग होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पावसाच्या अनिश्चिततेमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. याच बरोबर पाणी उपसा सुध्दा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला होता. परंतु आज चित्र बदलले असून मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीला निश्चित चांगले दिवस आले आहेत असे ते म्हणाले.
कृषी आयुक्त विकास देशमुख यावेळी म्हणाले, या कृषी परिषदेमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाले असून या मार्गदर्शनाचा त्यांनी आपल्या शेती व्यवसायात उपयोग करुन घेतला पाहिजे. कृषी क्षेत्रात शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमांच्या सुरुवातीला उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘शेतकऱ्यांच्या यशोगाथा- कृषी क्रांन्ती’ या पुस्तिकेचे, ‘कॉमन  फार्मर फोरम’ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे विमोचन व  साप्ताहिक आधुनिक किसानच्या ‘दुग्ध विशेष अंकाचे’ विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नांनावरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मराठवाड्यातील कृषी विभागातील अधिकारी, शेतकरीगट, शेतकरी, उद्योजक  उपस्थित होते.

Tuesday, 2 August 2016

मराठवाडा विभागात सरासरी
10.61  मि.मि. पाऊस

        औरंगाबाद, दि. 3: मराठवाडा विभागात आज दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  10.61  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक  31.40  मि.मी. पाऊस झाला तर उस्मानाबाद  जिल्हयात सर्वात कमी 2.77  मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 3 ऑगस्ट रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 31.40 (347.78 ) जालना 14.70 (424.36 ) परभणी  7.76 (388.26 ) हिंगोली 6.60  (554.66 ) नांदेड 14.71 (602.78 ) बीड 2.97 (298.03 ) लातूर 3.95 (471.74) उस्मानाबाद  2.77  (351.85 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 118.5 तर वार्षिक सरासरीच्या 55.2 टक्के पाऊस झाला आहे. 

Saturday, 30 July 2016

पीक विम्यासाठी 2 ऑगस्टअंतिम मुदत
लातूर, दि. 30 : राष्ट्रीय पीक विमा योजना 2016-17 खरीप हंगामात भात, ज्वारी ,बाजरी, मका,नाचणि, उडीद, , मुग, तुर, भुईमुग, कारळ, तीळ , सोयाबीन,सुर्यफूल, कापुस व कांदा या पीकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2016 होती. तथापि शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ व्हावा या हेतूने केंद्र शासनाने मुदत वाढ केली असुन आता अंतिम मुदत दिनांक 2 ऑगस्ट 2016  अशी करण्यात आली आहे.तरी शेतक-यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकानव्ये केले आहे.


कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

लातूर, दि. 28 : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्हयात कृषी उन्नती  योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ही योजना राबविण्यात येत आहे.तरी लातूर कृषी विभागात येणा-या सर्व जिल्हयातिल शेतक-यांनी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक अशोक किरनळ्ळी यांनी केले आहे.
या योजनेमध्ये शेतक-यांना अनुदानावर कृषि औजारांचा पुरवठा आणि भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवण्यासाठी कृषी औजारे बॅंक स्थापन करणे या दोन बाबी राबविण्यात येत आहेत.शेतक-यांना अनुदानावर कृषि औजारांचा पुरवठा त्यांच्या गरजेनुरूप आणि मागणी प्रमाणे करण्यात येणार असून सदर घटकासाठी औजारनिहाय व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला लाभार्थियांसाठी सरासरी 35 ते 60 टक्के त इतर लाभार्थ्यांना सरासरी 25 ते 50 टक्के अनुदान मर्यादा ठेवण्यात आली आहे.सदर बाबी अंतर्गत शेतक-यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, पीक संरक्षण उपकरणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे इत्यादी घेता येतील.भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवण्यासाठी कृषी औजारे बॅंक स्थापन करणे या बाबी अंतर्गत कृषी औजारावरील एकुन उच्चतम रु 10 ते 40 लाख पर्यंत भांडवली गूंतवणुकीची केंद्र स्थापन करणे असून त्यासाठी कृषी औजारे किमतीच्या 40 टक्के किंवा प्रति केंद्र 4 ते 16 लाख उच्चतम अनुदान अनुज्ञेय राहील.यामध्ये जमीनीची पूर्व म्शागत ते पीक प्रक्रीया  यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व औजारांची निवड करता येईल.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर http://www.mahaagri.gov.in उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती साठी संबंधित जिल्हयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.


चौकशी व प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांचे आवाहन


लातूर, दि. 27 : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था  लातूर विभाग येथे चौकशी व प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून यासाठी सहकार खात्यतुन निवृत्त झालेले अधिकारी,निवृत्त न्यायाधीश , वकील , सनदी लेखापाल यांनी विभागीय सहनिबंधक ,सहकारी संस्था  कार्यालय लातूर तसेच जिल्हा सहनिबंधक ,सहकारी संस्था लातूर उस्मानाबाद  नांदेड आणि बीड या कार्यालयातुन विहीत नमून्यातील अर्ज दिनांक 1 ऑग्स्ट ते 31 ऑगस्ट 2016 प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.याबाबतच्या अधिक माहितीसाठी उपरोक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.


Wednesday, 27 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 16.19 मि.मि. पाऊस

औरंगाबाद, दि. 27: मराठवाडा विभागात आज दि. 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  16.19  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत लातूर जिल्हयात सर्वाधिक 28.51  मि.मी. पाऊस झाला  तर परभणी जिल्हयात सर्वात कमी 6.91  मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 27 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 10.07 (286.04 ) जालना 14.38 (362.18 ) परभणी  6.91 (320.78 ) हिंगोली 14.06  (472.14 ) नांदेड 24.85 (514.93 ) बीड 11.29 (260.88 ) लातूर 28.51 (337.51) उस्मानाबाद  19.48  (281.66 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 111.5 तर वार्षिक सरासरीच्या 45.5 टक्के पाऊस झाला आहे.

Thursday, 21 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 16.73 मि.मि. पाऊस

          
        औरंगाबाद, दि. 22: मराठवाडा विभागात आज दि. 22 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  16.73  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत लातूर जिल्हयात सर्वाधिक 39.88  मि.मी. पाऊस झाला  तर औरंगाबाद जिल्हयात सर्वात कमी  0.06  मि.मि. पाऊस झाला.
            विभागात दि. 22 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.
औरंगाबाद 0.06 (242.79 ) जालना 1.34 (277.45 ) परभणी  16.53 (272.84 ) हिंगोली 1.88  (370.10 ) नांदेड 24.67 (433.81 ) बीड 25.09 (207.95 ) लातूर 39.88 (276.18) उस्मानाबाद  24.35  (236.79 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 101.2  तर वार्षिक सरासरीच्या 37.2  टक्के पाऊस झाला आहे. 

Wednesday, 13 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 0.35 मि.मि. पाऊस



        औरंगाबाद, दि. 14: मराठवाडा विभागात आज दि. 14 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  0.35  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत नांदेड जिल्हयात सर्वाधिक 1.32  मि.मी. पाऊस झाला. तर जालना, हिंगोली या जिल्ह्यात पावसाची नोंद झाली नाही.
            विभागात दि. 14 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 0.14 (234.40 ) जालना निरंक (273.55 ) परभणी  0.56 (243.85 ) हिंगोली निरंक  (346.12 ) नांदेड 1.32 (393.19 ) बीड 0.18 (168.71 ) लातूर 0.14 (216.36) उस्मानाबाद  0.44  (174.39 ). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 109.0  तर वार्षिक सरासरीच्या 32.9  टक्के पाऊस झाला आहे. 

Monday, 11 July 2016

मराठवाडा विभागात सरासरी 23.75 मि.मि. पाऊस

मराठवाडा विभागात सरासरी
23.75 मि.मि. पाऊस

        औरंगाबाद, दि. 11: मराठवाडा विभागात आज दि. 11 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी  23.75  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत औरंगाबाद जिल्हयात सर्वाधिक 64.62  मि.मी. पाऊस झाला. तर लातूर जिल्हयात सर्वात कमी  6.65  मि.मि. पाऊस झाला
            विभागात दि. 11 जुलै रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या  एकूण सरासरी पावसाची आहे.

औरंगाबाद 64.62 (212.09 ) जालना 38.86 (238.63 ) परभणी  9.93 (199.19 ) हिंगोली 27.57 (302.28)  नांदेड 27.47 (310.00 ) बीड 6.89 (162.59) लातूर 6.65 (205.02) उस्मानाबाद 8.00  (170.42). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या  104.2 तर वार्षिक सरासरीच्या 28.9  टक्के पाऊस झाला आहे.