Followers

Saturday 24 February 2024

विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मागदर्शन शिबिरात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सांगितले स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक'

 





·   स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ध्येय निश्चित करणे सर्वात महत्वाचे

·       ध्येय प्राप्तीसाठी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करण्याची गरज

·       स्टार्टअपमधील संधी, वैद्यकीय क्षेत्रातील करिअरबाबतही मार्गदर्शन

लातूर : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. तसेच ते ध्येय प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयीन जीवनापसूनच जोखून देवून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवन आणि त्यानंतरची एक-दोन वर्षे सर्व बाबींचा त्याग करून अभ्यासाला महत्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.


आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


सोशल मिडिया, तसेच इतर करमणुकीच्या साधनांपासून काही दिवस दूर राहून अभ्यास केल्यानंतर यश हमखास मिळाले. दोन-तीन वर्षांच्या त्यागामुळे आयुष्यातील पुढील 40-50 वर्षे सुखाचे आयुष्य जगायला मिळेल. त्यामुळे आपल्या ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करावेत, असे श्री. गोयल म्हणाले.


आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, तर कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवूनच स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडावा. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय ठावून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनीही यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.


करिअरमध्ये नियोजन महत्त्वाचे : डॉ. राजीव रंजन


*स्टार्टअपमधील संधी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन*


जिद्द आणि एखादी गोष्ट करण्याची धमक असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. करिअर निवडताना ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. करिअरमध्ये नियोजन महत्त्वाचे आहे, असे मत राजीव रंजन यांनी व्यक्त केले. ‘स्टार्टअपमधील संधी व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  यावेळी त्यांच्यासोबत गणेश देसाई यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राजीव रंजन म्हणाले, आजच्या प्रचंड धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले तर यशाचा प्रवास अधिक सोपा जातो. पैशाने सर्व काही गोष्टी खरेदी करता येत नाहीत. आनंदी आयुष्य जगणे ही कला प्रत्येकाने आत्मसात केली आहे. यावेळी कुणाल क्षीरसागर यांनी टॅक्सबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.


*‘वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी’बाबत मार्गदर्शन*


वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही. एखादे क्षेत्र जर आपण निवडले तर त्या क्षेत्रात मास्टरी मिळविल्याशिवाय मागे हाटायचे नाही, असा कानमंत्र डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी नमो महारोजगार मेळाव्यात आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात बोलताना दिला. ‘वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या संधी’ बाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रासह आयुर्वेदिक, होमिओपॅथी याही क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. लातूरने अनेक डॉक्टर घडविले आहे. यावेळी बोलताना डॉ. पल्लवी जाधव म्हणाल्या, जिद्द आणि चिकाटीने यश हमखास मिळविता येते. युवकांनी शिक्षणाबरोबर कौशल्ये वृद्धिंगत करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment