Followers

Monday 30 March 2020

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि भाव वाढ होणार नाही याकडे लक्ष द्या -पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या संबंधितांना सूचना



       लातूर, दि.30:- लातूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज लातूर येथील तेल उद्योजक अशोक भुतडा, दलमिल मालक हुकूमसेठ कलंत्री, लातूर कृषी उत्पन्नात बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा इत्यादीशी चर्चा केली. गहू, तांदूळ, ज्वारी, तेल , डाळ इत्यादी वस्तूंचा लातूर शहर आणि जिल्ह्यातील दहाही तालुक्यामधील गावांमध्ये तुटवडा जणवणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.  या वस्तूंची भाववाढ होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याचे निर्देश लातूर जिल्ह्याधिकारी यांना  दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जिल्ह्यातील रास्तभाव  धान्य दुकानातून टोकन पद्धतीने करण्यात येईल. जनतेने सर्व नियमांचे पालन करावे, करोनाला हरविण्याचे उद्दिष्ट गाठताना जनतेची अडचण होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासनही पालक मंत्र्यानी दिलेआहे.

No comments:

Post a Comment