Followers

Monday 4 May 2020

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाळण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे आवाहन


          उस्मानाबाद, दि. 4 (जिमाका ) :-  महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषयांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
         जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लॉकडाऊनच्या कालावधीत जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी  लॉकडाऊच्या वाढवलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने खालील उपक्रमांवर घातलेले निर्बंध संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 17 मे, 2020 पर्यंत लागू राहतील, असे आदेश दिले आहेत.
          राज्यांतर्गत  व आंतरराज्य विमान प्रवासी वाहतूक (वैद्यकीय सेवा व संरक्षण सेवा आणि भारत सरकारचे गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता), रेल्वेची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक (संरक्षण सेवा आणि भारत सरकाचे गृह मंत्रालयाने  परवानगी दिलेल्या बाबी वगळता), सार्वजनिक वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय बस सेवा (भारत सरकाचे गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता), मेट्रो रेल्वे सेवा, आंतरराज्य व वैयक्तिक प्रवासी वाहतूक (वैदयकीय व कारणास्तव व भारत सरकारचे गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता), सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस आदी संस्था बंद राहतील.  तथापि ऑनलाईन,दूरस्थ शिक्षण प्रणालीस परवानगी राहील. आतिथ्य सेवा (आरोग्य,पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, प्रवासी व्यक्तीसह अडकलेल्या व्यक्ती यांचे निवासाकरिता व विलगीकरण सुविधेकरिता  घेतलेल्या सेवा वगळून), सर्व सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, चित्रपटगृहे, कला केंद्रे, बार व सभागृहे आणि तत्सम ठिकाणे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर सभा-संमेलने. सर्व धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे जनतेसाठी बंद राहतील. धार्मिक मेळावे, सभा संमेलने सक्त मनाई असेल. पान, तंबाखू व इतर पदार्थांची दुकाने बंद राहतील. सर्व अत्यावश्यक बाबी वगळून संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत व्यक्तींच्या हालचालीला कडक प्रतिबंध राहील. 65 वर्षांवरील व्यक्ती दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय निर्देशानुसार अत्यावश्यक गरजा व आरोग्य विषयक बाबींच्या पूर्ततेसाठी होणारी हालचाल वगळून. तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशासोबतचे जोडपत्र क्रमांक 1 मधील कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.
           या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद, सर्व INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी, सर्व INCIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी , सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन अधिकारी,  नगर पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद,उस्मानाबाद, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल.
          या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
          या आदेशाची अंमलबजावणी  तात्काळ लागू करण्यात येत आहे.
जोडपत्र 1 : कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात सूचना :-
 1. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी तोंडावर मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.
2. सार्वजनिक ठिकाणी आणि परिवहन जे ज्या विभागाच्या किंवा व्यक्तींच्या अधिपत्याखाली असतील त्या विभागाने किंवा व्यक्तीने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर ठेवले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
3. कोणतीही संघटना किंवा सार्वजनिक जागेचा व्यवस्थापक यांनी 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास परवानगी देऊ नये.
4. विवाहासंबंधित मेळाव्यांमध्ये, समारंभामध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक राहील. अशा ठिकाणी जास्तीत जास्त 50 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असणार नाही.
5. अंत्यविधीच्या, अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असेल अशा ठिकाणी जास्तीत जास्त 20 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असणार नाही.
6. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास राज्य सरकारने शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने निश्चित केल्यानुसार दंडासह कारवाई केली जाईल.
7. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू  इ.सेवन करण्यास परवानगी असणार नाही.
8. पान, तंबाखू  इत्यादी पदार्थांची दुकाने बंद राहतील.
9. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांचे, आस्थापनांचे एकमेकांमधील अंतर 6 फूट  (2 गज की दूरी) राहील. याबाबत तसेच एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात, आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत. याबाबत दक्षता घेणे आवश्‍यक राहील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत कडक नियंत्रण ठेवणे आवश्‍यक राहील.
10. सर्व कामांच्या ठिकाणी तोंडावर व नाकावर मास्क, स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे. अशा मास्क, स्वच्छ रुमालांचा  पुरेसा साठा उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
11. आस्थापनांच्या प्रमुखांनी कामाचे ठिकाणी आणि कंपनीच्या वाहतुकीचे ठिकाणी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे.
12. कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा. तसेच कर्मचाऱ्यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी.
13. सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, हात धुणे, स्पर्श न करता सॅनिटायझरच्या वापराची सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. तसेच कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
14. कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व जागा उदा. दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी दोन्ही पाळयांच्या दरम्यानच्या  कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जंतुक होईल याबाबत खात्री करावी.
 15. 65 वर्षांवरील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. (अत्यावश्यक गरजा व आरोग्याविषयक बाबीच्या पूर्ततेकरिता होणारी हालचाल वगळून)
16. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक करणे. सर्व कर्मचारी 100% सदर ॲपचा वापर करीत असल्याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेच्या विभाग प्रमुखावर राहील.
17. मोठ्या बैठका घेणे टाळावे.
 18. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णावरील उपचाराकरिता लगतच्या भागातील रुग्णालये, दवाखाने निश्चित करुन त्यांची यादी कामाचे ठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध करुन द्यावी. कोविड-19 ची लक्षणे निदर्शनास आलेल्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णालय,  दवाखान्यामध्ये तात्काळ पाठविण्यात यावे. अशी लक्षणे निदर्शनास आलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालय, दवाखान्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचेपर्यंत वेगळे ठेवण्यासाठी त्यांना विलगीकरण करावयाची ठिकाणे निश्चित करावीत.
19. ज्या ठिकाणी  वैयक्तिक किंवा सार्वजनिक वाहतूक करणे शक्य नाही अशा ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.
20. कर्मचाऱ्यांना चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच त्यांच्यासोबत प्रभावी संवाद साधण्यात यावा.
                                                     ****

No comments:

Post a Comment