Followers

Wednesday 17 July 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी आषाढी एकादशीला राबविण्यात आला विशेष उपक्रम

 




·        अनेक मंदिर परिसरांमध्ये योजनेबाबत जनजागृती, अर्जांचे वितरण

लातूर : मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये, तसेच शहरी भागात विविध ठिकाणी योजनेच्या अर्ज नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंदिर परिसरातही विशेष शिबिराचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यात आली, तसेच विहित नमुन्यातील अर्जांचे वितरण करण्यात आले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाहीत, अशा महिलांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून हे ऑफलाईन अर्ज, विहित नमुन्यातील हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे इच्छुक पात्र महिलांकडून भरून घेणे, तसेच ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी ग्रामसेवककृषि सहायकतलाठीअंगणवाडी सेविकाआशा सेविकाग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज भरला जावा, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून महिलांचे अर्ज स्वीकारण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची सुविधा काही प्रमुख मंदिर परिसरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. लातूर शहरात बालाजी मंदिर, कालिकादेवी मंदिर आणि रामलिंगेश्वर मंदिर, औसा येथील हनुमान मंदिर, जळकोट येथील विठ्ठल मंदिर, वांजरवाडा येथील संत गोविंद माऊली संस्थानासह जिल्ह्यातील इतरही काही प्रमुख मंदिर परिसरात आयोजित शिबिरामध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती करून विहीत नमुन्यातील अर्जांचे वितरण आणि ऑफलाईन अर्जांची स्वीकृती करण्यात आली.

विशेष लेख मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत’ मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आहे सोपे

 

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला, मुलींना दरमहा 1 हजार 500 रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये लाभ दिला जाणार आहे. या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून यासाठी ‘नारीशक्ती दूत-Narishakti doot’ हे मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे मोबाईल ॲप डाऊनलोड पात्र लाभार्थी महिलाही घरबसल्या आपला अर्ज भरू शकतात. या मोबाईल ॲपद्वारे अर्ज ऑनलाईन अर्ज भरणे अतिशय सोपे असून हा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि कार्यपद्धतीची माहिती देणारा हा लेख...._
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे किंवा ज्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड आहे अशा कुटुंबातील महिला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण याजानेसाठी पात्र आहेत. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाच्या व्याख्याते पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली यांचा समावेश असून एका कुटुंबातील विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार महिला, तसेच एक अविवाहित महिला यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या महिलांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये थेट दरमहा 1 हजार 500 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून ‘नारीशक्ती दूत’ अॅपद्वारे महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाहीत, त्यांच्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तसेच अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका आणिमुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, महिला बचत गटातील समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी), आशासेविका, वार्ड अधिकारी, शहर प्रकल्प संचालक, महानगरपालिका बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ मोबाईल अॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. त्यानंतर अॅपमध्ये स्वतःची माहिती भरून लॉगिन आयडी तयार करुन घ्यावा. लॉगीन आयडीमधून योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या महिलेचा ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. या अॅपवरील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेवर क्लिक केल्यानंतर पात्र महिलांचा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यास ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जाचा नमुना व हमीपत्र याची पीडीएफ फाईल अॅपवर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून त्याप्रमाणे अर्ज व हमीपत्र भरावे आणि ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे द्यावे. अर्जाचा विहित नमुना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथे उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना काही बाबी काळजीपूर्वक विचारात घेऊन माहिती भरावी. यामध्ये महिलेचे नाव, जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता आधारकार्डवर नमूद असल्याप्रमाणे भरावा. महिलेची विवाहित, अविवाहित, घटस्पोटीत, विधवा, परितक्त्या, निराधार महिला याची नोंद अचूक नोंदवावी. महिलेचे आवश्यकतेप्रमाणे लग्नापूर्वीचेनाव व लग्नानंतरचे नाव नमूद करावे. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्ज भरतांना मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे, जेणेकरून महिलेस अर्ज स्वीकृती व आर्थिक लाभाची रक्कम बँकेत जमा झाली असल्याची माहिती तसेच अन्य माहिती मोबाईल एसएमएसद्वारे प्राप्त मिळेल. महिलेच्या बँक खात्याचा तपशील नमूद करताना बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अचूक नोंदवावा. बँक खाते आधार संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार संलग्न असल्यास लाभ अदा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
*योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी ग्रामस्तरीय समिती*
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज गावपातळीवर स्वीकारण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांचा या समितीमध्ये समावेश आहे. समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या समितीमार्फत योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी गावपातळीवर शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. ऑफलाईन प्राप्त झालेले अर्ज अॅपवर ऑनलाईन भरण्याची कार्यवाही समिती करणार आहे. तसेच लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करणे, यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात करण्याचे काम समितीमार्फत केले जाईल. यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्याचे आणि द्विरुक्ती टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क स्वरुपाची असून यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
*अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे*
• आधारकार्डची प्रत (दोन्ही बाजूने)
• महिलेचे जन्म प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र या पैकी कोणतेही एक प्रमाणपत्र.
• परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोवर विवाह केला असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
• नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्त्पन्नाचा दाखल म्हाणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयेपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळी अथवा केशरी शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स प्रत.
• अर्जदाराचे विहित नमुन्यातील हमीपत्र.
• आधार लिंक बँक खात्याचा तपशील.

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Tuesday 16 July 2024

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी, एजंटची मदत घेवू नका -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 



·         उदगीर येथील अर्ज स्वीकृती शिबिराला भेट

·         ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांना केले मार्गदर्शन

·         जास्तीत जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


लातूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी कोणत्याही एजंटची मदत घेण्याची किंवा शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटातील प्रेरिका मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच एजंटपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी उदगीर नगरपरिषदेने तळवेस येथील सामाजिक सभागृहात आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी अधिकारी जावेद शेख, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या अंगणवाडीमध्ये किंवा अर्ज स्वीकृती शिबिरात आपले ऑफलाईन अर्ज द्यावेत. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटाच्या प्रेरिका (सीआरपी) यांच्या माध्यमातून हे ऑफलाईन अर्ज कोणतेही शुल्क न आकारात ऑनलाईन करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच सर्व महिलांनी आपले स्वतःचे अर्ज भरून द्यावेत. आपल्या आजबाजूच्या महिलांनाही या योजनेची माहिती देवून अर्ज भरण्याचे आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने आयोजित शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी संवाद साधून त्यांच्याकडून योजनेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच यावेळी उपस्थित महिलांना मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

Thursday 11 July 2024

महाराष्ट्र कृषी क्रांतीचा जनक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे





·       
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

·        कृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित

·       15 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार

 

            नवी दिल्ली11 : पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या  शाश्वत विकास धोरणांची दखल घेत15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार काल नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

                   15 व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे ॲग्रीकल्चर टुडे समूहाच्या  वतीने आयोजन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे.

            पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानॲग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खानराज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

            पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची यावेळी माहिती दिली. श्री.शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचे जनक राज्य आहे. महाराष्ट्राला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा असून कृषी व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा आहे. राज्याचा प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना  मला आनंद होत आहे. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतो. महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याच्या रूपात निवडल्याबद्दल  'ॲग्रीकल्चर टुडेआणि परीक्षक मंडळाचे  आभार मानलेमहाराष्ट्राला मिळालेला पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांचे कष्टमेहनत आणि मातीच्या प्रेमाची ही फलश्रुती आहे. आमच्या शेतकऱ्यांना 'अन्नदाताम्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारने त्यांच्या हितांसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

            महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक असून राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जातोजेणेकरून अधिकाधिक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. बदलत्या काळानुसार आणि हवामानातील बदल पाहताआमचा शेतकरी सदैव जागरूक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र कृषी क्रांतीत अग्रेसर असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी यावेळी दिली.

            युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले असूनहोरपळीचे युग सुरु झाल्याचे आणि तातडीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्राने या आव्हानाला प्रतिसाद देत 21 लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा आणि 5 टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने जगातील मानव जात वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असूनबांबू ही विशेष वनस्पती असल्याचे सांगतबांबू पासून  2000 प्रकारच्या वस्तू तयार होत आहेत. 'बांबू घास नही खास हैअसे म्हणत बांबूमुळे पर्यावरण संवर्धन आणि अन्न सुरक्षा यावरही भर दिला जात असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सहकार्य केलं आहे. तसेचपीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रो मिलेट क्लस्टर सुरू केला आहे आणि सिंचन प्रकल्पांद्वारे 17 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचा ध्येय निश्चित केले आहे.राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं ठरवले आहे आणि कपास व सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.            राज्यातील कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये मायक्रो मिलेटचे उत्पादन वाढपीएम किसान सन्मान निधी दुप्पटनॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरणतृणधान्यांना एमएसपीहरित पट्टा निर्माण आणि सिंचन क्षमता वाढ यांचा समावेश आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतूक

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून  हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सुमारे 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करण्यात येत आहे. या क्रांतिकारी निर्णयाचे केंद्रीय कृषिमंत्री श्री. चौहान यांनी कौतुक केले.