Followers

Tuesday 8 March 2022

जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील सात बॅरेजेसना प्रशासकीय मान्यता

 


शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा ऐतिहासिक निर्णय

सुमारे शंभर कोटी रुपये यावर होणारा खर्च

लातूर,दि.8(जिमाका):-  जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील सात बॅरेजेसना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्यामुळे 19 किलोमीटर अंतराच्या या तिरु नदीवरील व परिसरातील शेतकऱ्यांच्यासाठी  ऐतिहासिक व सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा निर्णय असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती निर्माण होणार असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

          शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम होईल सुमारे 1 हजार 300 एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. सुमारे शंभर कोटी रुपये खर्च येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असून अशा आशयाचे पत्र जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी दिले. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याने 8 मार्च महिला दिनी जळकोट तालुक्याला आनंद दिल्याची भावना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

जळकोट तालुक्यातील तिरू नदीवर बॅरेजेस बांधण्यात येतील असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांनी एका शेतकरी मेळाव्यात दिले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र पाणी पुरवठा राज्यमंत्री या नात्याने त्याबाबत शासन दरबारी  विशेषतः जलसंपदा विभागाकडे जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.  8 मार्च 2022 रोजी या सात बॅरेजेस ना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.

          तालुक्यातील बेल सांगवी या ठिकाणी 11 कोटी 25 लक्ष 2150 रुपये खर्च करून बॅरेज बांधण्यात येणार आहे. तर डोंगरगाव -1 या ठिकाणी 13 कोटी 96 लक्ष 23 हजार 967 रुपये डोंगरगाव-2 19 कोटी 8 लक्ष 8 हजार 315 बोरगाव येथे 12 कोटी 81 लक्ष 38000 292 रुपये तिरुका येथे 18 कोटी 70 लक्ष 90 हजार 255 तर सुल्लाळी येथे 12 कोटी 31 लक्ष 39 हजार 187 रुपये तर गव्हाण येथे 11 कोटी 47 लक्ष 60 हजार 164 असे एकूण शंभर कोटी या बॅरेजेस वर खर्च होणार असून यामुळे जळकोट तालुक्याचे डोंगरी तालुका हे नाव पुसले जाऊन आता एक सिंचनाचा तालुका म्हणून याची नवीन ओळख होणार आहे. 1 हजार 300 एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे जमीन अंतर्गत पाण्याची पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 

 शेतकऱ्यांच्या जीवनात वरदान ठरून एक हरित क्रांती निर्माण होईल व या परिसरातील सुमारे बेलसांगवी, कोळनूर, मंगरूळ, एकुर्का, डोंगरगाव, माळीहिप्परगा, धनगरवाडी, सोनवळा, तिरुका, सुल्लाळी, आतनूर, गव्हाण, सांगवी याशिवाय इतर दहा ते पंधरा गावात ना या बेरजेचा फायदा होणार आहे सतत अवर्षणग्रस्त दुष्काळी व डोंगरी तालुका म्हणून यांची ओळख होती. तालुक्यातील केवळ एकमेव 19 किलोमीटर अंतराची तिरुका नदी असून त्या नदीवरील यापूर्वीचे कोल्हापुरी बंधारे मोडकळीस आल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य शासनाने त्याचे रूपांतर बॅरेजेस मध्ये करून जळकोट तालुक्यासाठी हा ऐतिहासिक केला असल्याची निर्णय केला असलयाची माहिती संजय बनसोडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment